पुणे : राज्यात गेल्या ८ दिवसापासून चर्चेत आलेल्या कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी आता ससून रूग्णालयातील दोन डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अल्पवयीन आरोपी याचे ब्लड सॅम्पलमध्ये अदलाबदल केल्याप्रकरणी अन् त्या बदल्यात १ लाख रूपये लाच घेतल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची आता राज्यस्तरावर चर्चा सुरू झाली आहे. यावरच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
हेही वाचा..अग्रवाल कुटुंबीय कायद्याच्या कचाट्यात चांगलेच अडकले, दुसरी तक्रार दाखल, प्रकरण काय ?
याप्रकरणी कुठलाही दबाव नाही, कुणीही पळवाट काढता कामा नये, जो कुणी दोषी असेल त्याला शासन झालं पाहिजे. मी दोषी असेन तर मलाही शिक्षा द्या. जेव्हा आम्ही विरोधी पक्षात असतो तेव्हा आम्ही म्हणतो राजकीय दबाव आहे. ही बोलण्याची पद्धत आहे. असं अजित पवारांनी म्हटलंय.
हेही वाचा…“फक्त ससूनमधील डॉक्टरच नव्हे, त्या रात्री अनेकांनी आपले ईमान विकले, जे हळू हळू समोर येतील”
मी कधीच कोणाला सोडविण्यासाठी फोन करत नाही. मला एखाद्या प्रकरणात फोन करायचा असेल तर मी पोलीस अधिक्षकांना करेन, ग्रामीणचा विषय असल्याने ग्रामीणच्या पोलीस अधिक्षकांना करेने असे म्हणत अजित पवारांनी अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुण्यातील घटनेत पोलिसांनी योग्य प्रकारे तपास केलाय . पोलिसांनी योग्य प्रकार CDR काढल्यामुळेच मुळापर्यंत या घटनेचे धागेदारे असल्याचं लक्षात आले आहे. हा जो मुलगा होता, त्याचे रक्ताचे नमुने रिप्लेस करून दुसरे नमुने घेण्यात आले होते, मात्र, त्याचे रक्ताचे नमुने पोलिसांकडे असल्यामुळे याचा पर्दाफाश करण्यात आला. त्यामुळे जे डॉक्टर यात सहभागी होते, त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी, पोलीस पुर्णपणे मुळाशी अन् तळाशी गेल्याशिवाय थांबणार नाही. असा इशारा देखील फडणवीस यांनी दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा..शरद पवारांचे दोन शिलेदार अजित पवार गटात दाखल, लवकरच धमाका नं. २ होणार
हेही वाचा..शरद पवारांचे दोन शिलेदार अजित पवार गटात दाखल, लवकरच धमाका नं. २ होणार
हेही वाचा..भुजबळ म्हणताहेत, विधानसभेला आम्हाला ८० ते ९० जागा, मग भाजप अन् शिंदेंच्या वाट्याला किती ?
हेही वाचा..“०४ जूननंतर महाराष्ट्रात चमत्कार घडणार असून महाविकास आघाडी ३५ जागा जिंकेल”
हेही वाचा..विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप अन् मनसे आमनेसामने, कोण जिंकणार ?