मुंबई : काल भारतरत्न लता मंगेशकर यांचे कोरोना आजारामुळे निधन झाले. गेल्या २८ दिवसांपासून त्यांची कोरोना आणि न्यूमोनिया आजाराशी झुंज सुरु होती. लतादीदींच्या पार्थिवावर काल मुंबईत शिवाजीपार्कवर अंतिम संस्कार करण्यात आले.
एक झंझावती युगं संपलं; गानकोकिळा लता मंगेशकर यांच निधन, देशावर शोककळा
याच शिवाजीपार्कमध्ये लतादीदींचं स्मारक उभारण्यात यावं यासाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यकडे मागणी केली आहे. मात्र या मागणीसंदर्भात बोलताना शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी राम कदम यांच्या मागणीच्या एकदम विरोधात प्रतिक्रिया दिलीय. लतादीदींच्या स्मारकावरुन राजकारण नको, असंही राऊत म्हणालेत.
स्वर युगाचा अंत झाला, मातृतुल्य आशीर्वाद हरपला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहलेल्या पत्रात म्हटलं होतं की भारतरत्न दिवंगत स्वर्गीय लतादीदींवर शासकीय इतमामात शिवाजी पार्क दादर, येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याच शिवाजीपार्कवर गानकोकिळा लतादीदींचे स्मृतीस्थळ उभारुन त्यांच्या स्मृती कायमस्वरुपी जतन कराव्यात ही नम्र विनंती मी कोट्यावधी संगीत प्रेमी व लतादीदींच्या चाहत्यांच्या वतीने करत आहेत. तातडीने त्यांच्या विनंतीचा, भावनेचा सन्मान करावा आणि त्याच ठिकाणी जगताला प्रेरणा देणारे स्मृतीस्थळ बनवावे, असं राम कदम यांनी पत्रात म्हटलं होतं.
महिला वर्गाने बाहेरून पर्यटक बनून आलेल्या पक्षाला थारा देवू नये – नाईक
यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की काहीजण लतादीदींच्या स्मारकाबद्दल बोलत असले तरी त्याचं स्मारक करणं सोपे नाहीय. लतादीदी काही राजकारणी नव्हत्या. ते असं व्यक्तीमत्व होतं की त्याचं स्मारक करणं सोपे नाहीय. त्या खूप मोठ्या व्यक्ती होत्या असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Read also:
- नितेश राणेंचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला; जामीन अर्जावर आता उद्या सुनावणी
- स्वर्गीय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हेच गोव्याच्या विकासाचे शिल्पकार – देवेंद्र फडणवीस
- उदयनराजेंच्या दहशतीच्या पार्श्वभूमीमुळे सातारा एमआयडीसीची वाढ होईना; शिवेंद्रराजेंचा गंभीर आरोप
- म्हापश्याच्या सर्वांगीण विकासासाठी जनताच आता जोशुआ डिसुझा यांना निवडून देईल – खेडेकर
- महाविकास आघाडीच्या छळामुळेच गजानन चिंचवडे यांचा बळी : माजी खासदार अमर साबळे