पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांना रात्री बारा वाजता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसमध्ये बारामती अॅग्रोचे दोन प्लांट बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे. यातच राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कारवाई करण्यात आल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. यात बारामती अॅग्रो नेमकी काय आहे. ? याची चर्चा सध्या सुरू आहे.
हेही वाचा…एकनाथ शिंदेंच्या सेनेत इनकमिंग सुरूच, ठाकरेंचे ‘तीन’ शिलेदार शिंदेंच्या सेनेत दाखल
बारामती अॅग्रो कंपनीचे सीईओ म्हणून रोहित पवार काम पाहत आहेत. तर रोहित पवारांचे वडिल या कंपनीचे संचालक आहेत. पशू खाद्य बारामती अॅग्रोचं मुख्य प्रोडक्ट असून साखर उत्पादनही सुरू करण्यात आलं आहे. याच्या बारामती आणि छत्रपती संभाजीनगर या दोन ठिकाणी साखर कारखाने आहेत. दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री फार्म आणि चिकन व्यवसायही बारामती अॅग्रोद्वारे केले जातात.
हेही वाचा…अजिदादांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगणार ? भाजप नेत्यांनी दिले ‘हे’ संकेत
दरम्यान, महाराष्ट्र नियंत्रण मंडळाची नोटीस दोन मंत्र्यामुळे आल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली. असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…‘या’ तीन मुख्यमंत्र्यांचा पत्ता कट होणार, भाजप विधानसभेच्या निवडणुकांमध्ये धक्कातंत्राचा वापर करणार
हेही वाचा…“रोहित पवारांना नोटीस का आली ? याबद्दल माझ्या मनात 100 टक्के..,” आव्हाडांचा रोख नेमका कुणाकडे ?
हेही वाचा…“शरद पवारांचा विचार नथुराम गोडसे यांच्या पायाच्या धुळी इतका सुद्धा नाही,” गुणरत्ने सदावर्तेंची जोरदार टिका
हेही वाचा…मोठी बातमी..! सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्षांविरोधात ठाकरे गटाची याचिका? सुनावणीकडे लक्ष
हेही वाचा…” ती लोक मराठी लोकांना खालच्या दर्जाचे, मांस खाणारे म्हणून हिनवतात म्हणून घरे मिळत नाहीत”, आव्हाडांचं ‘त्या’ व्हिडीओवरून मोठं भाष्य