धाराशिव : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात आता प्रचाराला प्रंचड वेग आलाय. यातच धाराशिव मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत उमरगा-लोहारा विधानसभेचे ज्ञानराज चौगुले यांनी विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधत जोरदार टिका केलीय.
अर्चना पाटील यांच्यासाठी ज्ञानराज चौगुले यांनी प्रचारसभा घेतली. यावेळी चौगुले यांनी निंबाळकर यांच्यावर सडकून टिका केली. निवडणुकीच्या शर्यतीच्या रणांगणात एकटाच पळत सुटला आहे. अन् मीच जिंकलो म्हणू लागला आहे. असं म्हणत तो एक नंबरचा ठग माणूस आहे आणि या ठगाला हाकलून देण्याची संधी आपल्याला आहे. अशा शब्दात चौगुले यांनी निंबाळकरांवर अप्रत्यक्ष घणाघात केलाय.
पुढे बोलताना आमदार चौगुले म्हणाले, जेव्हा तिकीट वाटपावरून चर्चा सुरू होती. तेव्हा येथील आपल्या जिल्ह्याचे विद्यमान खासदार आपणच श्रेष्ठ असल्याचे समजत होते, याचं उदाहरण द्यायचं झालं तर शर्यत लागली होती आणि त्या शर्यतीच्या रणांगणात हा एकटाच पळत सुटला निवडणुकीची तारीख आणि उमेदवारी डिक्लेअर व्हायची होती, त्याच्या आधीच हा पळत सुटला आणि मी जिंकलो म्हणू लागला. तो एक नंबरचा ठग माणूस आहे, या ठगाला हाकलून येण्याची संधी आपल्याला आता मिळाली आहे. कोणी नसताना मी पहिला आलोय हे म्हणणं सोपं असतं, पण आता रणांगणात आमचा उमेदवार उभा आहे. आता जिंकून दाखव असा आव्हान चौगुले यांनी दिले.
मी त्या उमेदवाराबरोबर काम केलेलं आहे. हा अधिकारी लोकांना फोन करतो आणि काहीही बोलतो, मी अनेकदा त्याला सांगितलं असं करणे योग्य नाही, पण नेता म्हटलं की असं करावंच लागतं असं तो सांगतो तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की तू ही सवय बदलून टाक नाहीतर पुढच्या काळात तो सभागृहाचा नेता राहणार नाही आणि तसंच झालं. असेही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि महायुतीचा कार्यकर्ता म्हणून आपण जेंव्हा प्रचाराला लोकांमध्ये जाऊ त्यावेळी प्रत्येकाला आपण हे पटवून दिले पाहिजे की, आपण आपला सर्वोच्च नेता निवडण्यासाठी बहुमूल्य असं आपलं मत अर्चना पाटील यांना दिले पाहिजे. चार-पाच महिन्यापूर्वी आपल्याला उजनीच 60 टीएमसी पाणी मंजूर झालं होतं, 572 कोटीचा टेंडर झालं होतं आपला पाण्याचा प्रश्न, विजेचा प्रश्न या निधीने सुटणार आहे. केंद्राचा निधी मिळाल्यानंतर हे प्रकल्प पूर्ण होणार आहे त्यासाठी विकासाचा विचार करणारा खासदार लोकसभेत जाणं गरजेचं आहे म्हणून आपण अर्चना ताईंना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन चौगुले यांनी केले.
READ ALSO :
हेही वाचा..अजित पवारांसह सुनेत्रा पवार दगडुशेठच्या चरणी लीन
हेही वाचा…Live Ajit Pawar | सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ महायुतीची पुण्यात सभा, लाईव्ह