मुंबई : ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर आता भाजप नेते आक्रमक झाले आहेत. एकीकडे गोपीचंद पडळकर सरकारवर निशाणा साधत असताना आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
राज्य सरकारनं ओबीसींची जनगणना करावी, अशी मागणी करतानाच राज्यातील तहसील कार्यालयावर 25 तारखेला राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची घोषणा प्रकाश शेंडगे यांनी केली केली आहे.
सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे राज्य सरकारने तात्काळ ओबीसी जनगणना करावी. यासाठी राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली आहे. मात्र याबाबतचा अध्यादेश अजूनही काढण्यात आलेला नाही. यासोबतच मागासवर्गीय आयोगामध्ये जे सदस्य घेण्यात आले आहेत ते सदस्य राजकीय पक्षाचे असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे यामध्ये तात्काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालून बदल करावेत आणि नवीन सदस्य नेमावेत, अन्यथा आम्ही राज्यव्यापी आंदोलन करणार, असा इशारा त्यांनी दिला आहे.
ओबीसी समाजाला न्याय मिळत नसेल तर ओबीसी कल्याण मंत्रालय तत्काळ बरखास्त करा अशी मागणी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
Read Also :