पुणे : आंबील ओढ्यातील घरांवर महापालिकेने हातोडा चालवला होता. या प्रकरणाला काही तांसांमध्येच स्थगिती देण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर निलम गोऱ्हे यांनी आज (बुधवारी) महापालिकेचे आयुक्त आणि अधिकाऱ्यांसोबत आंबिल ओढ्यची पाहणी केली. आंबिल ओढयातल्या नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर होणार आल्याचे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी म्हणले आहे. पाहणी दौऱ्यादरम्यान त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.
आंबील ओढा कारवाईशी माझा काय संबंध?; अजित पवार
आंबिल ओढ्या मध्ये झालेल्या अतिक्रमण कारवाईला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. आक्रमक झालेल्या नागरिकांनी महापालिकेसमोर आंदोलन देखील केलं होतं. एकीकडे या प्रकरणावरून राजकारण रंगलेले असतानाच अनेक नेत्यांनी या घटनास्थळाला भेट देत नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले होते. या संपूर्ण प्रकरणात सुरुवातीपासून सक्रिय असणाऱ्या नीलम गोऱ्हे यांनी आज अधिकाऱ्यांसोबत संपूर्ण आंबिल ओढयाची पाहणी केली.यावेळी इथे होणाऱ्या कामाबाबत सादरीकरण देखील करण्यात आलं.
पुण्यातील आंबील ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला अखेर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे कडून स्थगिती
यानंतर बोलताना गोऱ्हे म्हणाल्या,” आंबिल ओढ्याच्या काठी राहणाऱ्या नागरिकांचे कायमचे स्थलांतर होणार नाही.फार तर तात्पुरते स्थलांतर होईल. आत्ता जिथे कारवाई झाली ,घरे पाडण्यात आली , ती जागा पसंत नसेल तर दुसरीकडे स्थलांतर करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेतली होती. मात्र मार्ग काढण्याआधीच कारवाई झाली”, असेही त्यांनी सांगितले.
Read Also :
- विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यास शाळांची मान्यता रद्द करू – वर्षा गायकवाड
- अशीच तत्परता राज्यपाल, १२ आमदारांच्या नियुक्त्यांसंदर्भात कधी दाखवणार?
- कोल्हापूर मधील शेतकरी, व्यापाऱ्यांना सक्तीच्या वीज बील वसूलीत सुट द्यावी, अमल महाडिकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- “मी खासदारकी सोडली, विधानसभा अध्यक्षपदाची खुर्ची सोडली; त्यामुळे मला खुर्चीची चिंता नाही”
- चित्रा वाघ यांच्यावर भाजपने सोपवली आणखी एक मोठी जबाबदारी!