पुणे : शिवसेना आणि धनुष्यबाण संदर्भात अंतिम सुनावणी ही 30 जानेवारीला होणार आहे. त्याआधी ठाकरे आणि शिंदे गटातील नेत्यांनी शिवसेना आणि धनुष्य़बाण आम्हालाच मिळणार असल्याचा दावा केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“मुख्यमंत्र्यांनी संतोष बांगरांना अधिकाऱ्यांना मारण्याचा परवाना दिलाय का?” राष्ट्रवादीचा संतप्त सवाल
शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरे यांच्याच वडिलांनी काढला आहे. त्यासाठी असंख्य लाखो कार्यकर्त्यांचं मोठं कष्ट आहे. तसेच जेव्हा बाळासाहेब ठाकरे हयात होते, तेव्हाच त्यांनी उद्धव ठाकरे यांना आपला उत्तराधिकारी म्हणून म्हणून सगळ्यांच्या समंतीने ठरलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना विरोध करणं म्हणजे बाळासाहेबांच्या निर्णयाला विरोध करणं असं होतं. असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्यावर दिपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘‘इंद्रायणी थडी’’मुळे मिळेल २० हजार महिलांच्या हाताला रोजगार! फडणवीसांकडून महोत्सवाचे कौतूक
हिंदुत्वासाठी लांब जाणं हे बाळासाहेबांनी कधीच सांगितलं नसतं. उत्तराधिकारी हा विचाराचं व्हायचं असतं. अन् आपण त्या विचारापासून लांब गेलो. यामुळे उत्तराधिकारी टिकत नसतो. मग ते शासन बाळासाहेबांनी स्थापन केलेली युती आहे. तो अधिकार बाळासाहेबांनी युतीला दिला आहे. असं दिपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
Read also
- ‘पठाण’मुळे मराठी चित्रपटांना स्क्रिन्स मिळत नसतांना आव्हाड मुंब्याच्या कोणत्या बिळात लपून बसला?
- शिंदे गटाने नवस केलेल्या कामाख्या देवीचा चित्ररथ कर्तव्यपथावर, अनेकांच्या नजरा
- “संविधानाच्या तत्त्वांना सत्ताधारी पक्षांकडून हादरे देण्याचा प्रयत्न,” राष्ट्रवादीचा निशाणा
- “कसबा, चिंचवड पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, हे सगळ्यांना उचित राहिल…!” देवेंद्र फडणवीस
- शिंदेंनी बारामतीचा गड फोडला…! बारामती, दौंड, अन् इंदापुरचे कार्यकर्ते शिंदे गटात