मुंबई : आज जरी मुख्यमंत्री असतो तरी येथे येऊन प्रकल्पाबाबत स्थानिकांशी चर्चा केली असती. विरोधक माझ्यावर आरोप करतात. पण आज सुपारी घेऊन आलो असतो तर माझी तुमच्यासोबत बोलण्याची हिमंत झाली नसती. मग त्या सुपारीबाज येथे येऊन का तुमच्याशी संवाद साधत नाहीत. असा प्रतिहल्ला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारसह भाजपच्या नेत्यांवर चढवला. आज उद्धव ठाकरे यांनी बारसू येथील नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…ठाकरेनंतर आता जयंत पाटलांनीही दिला राज्य सरकारला इशारा, म्हणाले, “जर सरकार ते टाळून रेटारेटी केली तर………”
ज्यांच्या गद्दारीची नोंद ३३ देशांनी घेतली आहे. तेव्हा ३३ देश काय महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यातील लोकही यांना ओळखत नव्हती. जेव्हा समृद्धी महामार्गावेळी विरोधाला लोक रस्त्यावर उतरली, माझ्याकडे धावत आली होती. तुम्ही आल्याशिवाय प्रकल्प होणार नाही असं ते म्हणाले. तेव्हा संभाजी नगर, जालन्यात आम्ही फिरलो. ज्याची नोंद कागदावर ओसाड म्हणून केली होती, तिथे मोसंबीच्या फळबागा होत्या. त्यामुळे त्यांची मोबदल्याची मागणी होती. यामुळे आम्ही मुंबईत बैठक घेतली. त्या फळबागा वाचवून बाजूने तो रस्ता कसा जाईल, याची आखमी केली. तो विरोध आम्ही मोडून नाही काढला. तो समजून घेतला. तिथल्या विरोधकांची समजूत काढून, बागा वाचवून मग तो रस्ता झाला. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“प्रकल्प झाला तर संपुर्ण महाराष्ट्र पेटवू”, बारसूत जाऊन उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला गर्भित इशारा
उद्धव ठाकरे यांच्या टिकेला मंत्री दिपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कोकणात रोजगार निर्माण झाला पाहिजे आणि येथील युवकांना रोजगार मिळाला पाहिजे, ही शिंदे-फडणवीस सरकारची भूमिका आहे. मात्र, राजापुरमध्ये जाऊन उद्धव ठाकरे विकासात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. केवळ विरोध करायचा म्हणून त्यांचा विरोध सुरू आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“साथ द्यायचं सोडून चंद्रकांत पाटील अन् शंभुराज देसाई कोणत्या बिळात लपून बसले ?”
हेही वाचा…“महाराष्ट्राचा भगवा दिल्लीवर फडकवण्यासाठी आबा मी आज उद्धवसाहेबांसोबत”, स्नेहल जगतापांचा ठाकरे गटात प्रवेश
हेही वाचा…“अजित पवार भाजपसोबत येणार नाहीत, राष्ट्रवादीची नौटंकी चाललीय”
हेही वाचा…“सरकार पडल्यानंतर त्यांचं काय करायचं ते आम्ही करू”, उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर जोरदार घणाघात
हेही वाचा…“शिंदेंना बाजूला ढकलून फडणवीस मुख्यमंत्री पदावर बसत असतील तर, त्याची चिंता शिंदेंसह चाळीसवीरांनीही करावी”