सांगली : राज्यात सध्या राजकीय वातावरण विविध मुद्यांवरून चांगलचं तापलं आहे. यातच आता मी पुन्हा येईन, पण कसा येईन, हे सर्वांना माहिती आहे. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मी पुन्हा येईन या विधानाचा उल्लेख केला. त्यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडत टोला हाणला आहे.
हेही वाचा…“कुणाला जायचं असेल तर त्यांना मी..” , अजित पवारांच्या प्रश्नांवर शरद पवारांचं मोठं विधान
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत मराठी भाषिकांना संबोधित करताना फडणवीसांनी हे विधान केलं. त्यावर फडणवीस सध्या दुसऱ्या क्रमांकावर बसलेले आहेत. ते शिंदेंना बाजूला ढकलून फडणवीस मुख्यमंत्री पदावर बसत असतील तर त्याची चिंता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या चाळीसवीरांनी करावी. असा खोचक टोला जयंत पाटलांनी हाणला आहे.
हेही वाचा…“अखेर शरद पवाराच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम, पवारांची मोठी घोषणा”
जयंत पाटलांनी बारसू येथील प्रकल्पावरही भाष्य केले. ते म्हणाले की, राज्यात होणाऱ्या कोणत्याही चांगल्या कामाला राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचा विरोध नाही. केंद्र सरकारने कामगार कायदे बदलले आहेत. त्यामुळे तीनशेहून कमी कामरागर असलेल्या ठिकाणी कामगारांना कोणतेही संरक्षण नाही. यातून कामगारांचे शोषण होत आहे. त्याप्रमाणेच बारसू येथील कामगारांचे, तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांचे शोषण होऊ नये, तसेच तिथल्या पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याचा विश्वास सरकारने लोकांमध्ये निर्माण करावा. अशी महाविकास आघाडीची भूमिका असल्याचंही जंयत पाटलांनी स्पष्ट केले.
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरेनंतर आता जयंत पाटलांनीही दिला राज्य सरकारला इशारा, म्हणाले, “जर सरकार ते टाळून रेटारेटी केली तर………”
हेही वाचा…“प्रकल्प झाला तर संपुर्ण महाराष्ट्र पेटवू”, बारसूत जाऊन उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला गर्भित इशारा
हेही वाचा…“‘टिल्ल्या-पिल्ल्या’ असं उल्लेख करत राणेंवर सेनेची जहरी टिका, उद्धव ठाकरे बारसुत दाखल”
हेही वाचा…जयंत पाटलांसाठी शरद पवार पाच मिनिटे थांबले, राष्ट्रवादीमधील बंड रोखण्यासाठी त्यांच्याकडे “नवी” जबाबदारी?
हेही वाचा…“गावोगावी, चौकाचौकात साखर वाटून साजरा आनंद करा, प्रदेशाअध्यक्षांकडून कार्यकर्त्यांना आवाहन