रत्नागिरी : शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज महाड मध्ये जाहीर सभा घेणार आहेत. त्याआधी उद्धव ठाकरे यांनी बारसू प्रकल्पाबाबत नागरिकांशी संवाद साधत राज्य सराकारव हल्लाबोल केला. यातच आज उद्धव ठाकरे यांच्या सभेत महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काॅंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस स्नेहल जगताप शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहे.
हेही वाचा…“‘टिल्ल्या-पिल्ल्या’ असं उल्लेख करत राणेंवर सेनेची जहरी टिका, उद्धव ठाकरे बारसुत दाखल”
स्नेहल जगताप शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं त्यांनी अगोदर स्पष्ट केलं होतं. परंतु त्याआधी त्यांनी एक ट्विट करत प्रवेश करत असल्याची माहिती दिली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, महाराष्ट्रासोबत गद्दारी करणाऱ्यांना झुकवण्यासाठी व महाराष्ट्राचा भगवा दिल्लीवर नेहमी फडकवण्यासाठी आबा मी आज उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करत आहे, आबा तुमच्या आशीर्वादबरोबरच उद्धव साहेबांची ही साथ आहे. आता बघू महाराष्ट्राकडे वाईट नजरेने पाहण्याची कोणाच्यात ताकत आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…जयंत पाटलांसाठी शरद पवार पाच मिनिटे थांबले, राष्ट्रवादीमधील बंड रोखण्यासाठी त्यांच्याकडे “नवी” जबाबदारी?
दरम्यान, आजच्या सभेत शिवसेनेच्या अनेक नेत्यांची हजेरी राहणार आहे. चांदे क्रिंडागणारव होणाऱ्या या सभेत आ सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, उपनेत्या सुषमा अंधारे, भास्कर जाधव आदि उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रासोबत गद्दारी करणार्यांना झुकवण्यासाठी व महाराष्ट्राचा भगवा दिल्लीवर नेहमी फडकण्यासाठी आबा मी आज उध्दवसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करत आहे,आबा तुमच्या आशिर्वादा बरोबरच उध्दवसाहेबांची ही साथ आहे.आता बघू महाराष्ट्राकडे वाईट नजरेने पाहण्याची कोणाच्यात ताकत आहे. pic.twitter.com/j4q5tZDmpP
— Snehal Jagtap (@SnehalJagtap_) May 6, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“अजित पवार भाजपसोबत येणार नाहीत, राष्ट्रवादीची नौटंकी चाललीय”
हेही वाचा…“सरकार पडल्यानंतर त्यांचं काय करायचं ते आम्ही करू”, उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर जोरदार घणाघात
हेही वाचा…“शिंदेंना बाजूला ढकलून फडणवीस मुख्यमंत्री पदावर बसत असतील तर, त्याची चिंता शिंदेंसह चाळीसवीरांनीही करावी”
हेही वाचा…ठाकरेनंतर आता जयंत पाटलांनीही दिला राज्य सरकारला इशारा, म्हणाले, “जर सरकार ते टाळून रेटारेटी केली तर………”
हेही वाचा…“प्रकल्प झाला तर संपुर्ण महाराष्ट्र पेटवू”, बारसूत जाऊन उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला गर्भित इशारा