मुंबई : राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, त्यांनी १४ वर्ष वनवास भोगला होता, मग ते शाकाहारी कसे असू शकतात ? असं वक्तव्य राष्टवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. त्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन केलेत. यानंतर पत्रकार परिषद घेऊन आव्हाडांनी या वक्तव्याबाबत खेद व्यक्त केला. तर भाजपच्या आंदोलनावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार प्रहार केला.
हेही वाचा…“आपल्याकडे ब्रॅंड शोधण्याची गरज नाही, आपला ब्रॅंड फक्त शरद पवार”
जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजपने मुंबई ठाण्यात तसेच पुण्यात जोरदार आंदोलने केलीत. तर जितेंद्र आव्हाड यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी केलीय. यावरून दानवे यांनी भाजपला चांगलचं सुनावलं. अंबादास दानवे म्हणाले की, प्रभू श्रीराम आपले आदर्श असून असे वक्तव्य करणं अत्यंत चुकीचं आहे. जितेंद्र आव्हाडांची भूमिका ही बहुजनांची आहे. ठिक आहे. मटन खात होते हे म्हणणं चुकीचं आहे. याचं आम्ही समर्थन करत नाही. परंतु मटणाच्या पार्ट्या झोडणारे लोक आंदोलनात उतरले आहेत. अस म्हणत अंबादास दानवे यांनी भाजपच्या काही नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय.
हेही वाचा…“22 जानेवारीला महाराष्ट्रात दारू आणि मास बंदी करा,” भाजपच्या ‘या’ आमदाराने केली मागणी
दरम्यान, अहमदनगर येथील पक्षाच्या शिबीरात जितेंद्र आव्हाडांनी रामाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपने पुण्यात नाशिक, मुंबईत आंदोलने केलीत. तर भाजपचे आमदार राम कदम यांनी घाटकोपरमध्ये जितेंद्र आव्हाडांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. यातच जितेंद्र आव्हाड यांना तात्काळ अटक करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे आव्हाडांच्या वक्तव्याचे पडसाद आता सगळीकडे पसरू लागले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…जितेंद्र आव्हाडांना तात्काळ अटक करा, भाजप आमदाराची मागणी, भाजपा आक्रमक
हेही वाचा…“डोळे मिटून दुध पितंय कोण? मिंधे-भाजप बोके दोन”, ठाकरे गटाची सरकारवर मोठी टिका
हेही वाचा…“महाराष्ट्राची महानंदा कोण विकत आहे?” इतिहास दाखवत राऊतांचा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना सवाल
हेही वाचामंत्री आहे की गुंड ? लोकांना कुत्र्यासारखं मारा, सत्तारांचा पोलिसांना आदेश, गौतमी पाटलाच्या कार्यक्रमात मोठा राडा
हेही वाचा…“श्रीराम शाकाहारी नव्हता, मांसाहारी होता,” आव्हाडांच्या वक्तव्यानंतर मोठा वाद, गुन्हा दाखल