मुंबई : राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, त्यांनी १४ वर्ष वनवास भोगला होता, मग ते शाकाहारी कसे असू शकतात ? असं वक्तव्य राष्टवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. त्यावरून आता राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर आज संपुर्ण राज्यात भाजपकडून आंदोलने करण्यात आले. तर जितेंद्र आव्हाड यांना अटक करा, अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे.
हेही वाचा…“22 जानेवारीला महाराष्ट्रात दारू आणि मास बंदी करा,” भाजपच्या ‘या’ आमदाराने केली मागणी
अहमदनगर येथील पक्षाच्या शिबीरात जितेंद्र आव्हाडांनी रामाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपने पुण्यात नाशिक, मुंबईत आंदोलने केलीत. तर भाजपचे आमदार राम कदम यांनी घाटकोपरमध्ये जितेंद्र आव्हाडांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. यातच जितेंद्र आव्हाड यांना तात्काळ अटक करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे आव्हाडांच्या वक्तव्याचे पडसाद आता सगळीकडे पसरू लागले आहेत.
हेही वाचा…“सहकार बुडवणारे सरकार, सरकारच्या महाराष्ट्रद्रोही कृतीचा तीव्र निषेध”, राज्यातील विरोधक आक्रमक
दरम्यान, श्रीरामबाबत वक्तव्या केल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच आता जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत खेद व्यक्त केला आहे. पत्रकार परिषद घेऊन जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामबाबत काही एतिहासिक पुरावे दिलेत. यातच कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो, परंतु भाजपची मंडळी कुठलाही अभ्यास न करता टिका करता, त्यांनी अगोदर अभ्यास करावा, असा पलटवार देखील आव्हाडांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“डोळे मिटून दुध पितंय कोण? मिंधे-भाजप बोके दोन”, ठाकरे गटाची सरकारवर मोठी टिका
हेही वाचा…“महाराष्ट्राची महानंदा कोण विकत आहे?” इतिहास दाखवत राऊतांचा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना सवाल
हेही वाचामंत्री आहे की गुंड ? लोकांना कुत्र्यासारखं मारा, सत्तारांचा पोलिसांना आदेश, गौतमी पाटलाच्या कार्यक्रमात मोठा राडा
हेही वाचा…“श्रीराम शाकाहारी नव्हता, मांसाहारी होता,” आव्हाडांच्या वक्तव्यानंतर मोठा वाद, गुन्हा दाखल
हेही वाचा“आपल्याकडे ब्रॅंड शोधण्याची गरज नाही, आपला ब्रॅंड फक्त शरद पवार”