मुंबई : राज्यातील उद्योग-व्यवसाय तसेच महत्वाचे प्रकल्प गुजरात पळवले जात असतांना महाराष्ट्रातील आघाडीची महानंद डेअरीही केंद्राच्या नॅशनल डेव्हलपेंट बोर्डाला चालवायला देऊन नंतर गुजरातच्या पर्यायाने अमूलच्या घशात घालण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचं कारण देत महानंदर राष्ट्रीय दुद्ध विकास महामंडळाकडे सोपवण्याच्या हालचालींना वेग आलाय. त्यावरून आता राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर जोरदार टिका करण्यास सुरूवात केली आहे.
हेही वाचा..“ते हिंदूत्व तुम्ही स्विकारणार का ?” आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल अन् जनतेला सवाल
सहकार बुडवणारे सरकार म्हणत काॅंग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्याला सुमारे 120 वर्षांची सहकाराची परंपरा आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण वसंत दादा पाटील आणि शरद पवार जी यांनी राज्यात विणलेल्या सहकाराच्या जाळ्याला कुरतडण्याचे काम राज्यातील महायुती सरकार करत आहे. दुग्ध व्यवसायातील शिखर सहकारी संस्था असलेली महानंद ही संस्था पुन्हा एकदा गुजरातच्या दावणीला बांधण्याचे काम सरकार करीत आहे. जगभरातल्या आर्थिक मंदीतही केवळ सहकारामुळे महाराष्ट्र टिकून राहिला, याचे जराही भान नसलेल्या राज्यकर्त्यांची सहकार चालवण्याची कुवत नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सरकारच्या महाराष्ट्रद्रोही कृतीचा तीव्र निषेध असंही त्या म्हणाल्या.
हेही वाचा…“फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा,” अमोल कोल्हेंची केंद्र सरकारकडे मागणी
दरम्यान, आधी वेदान्ता फॉक्सकॉन नंतर डायमंड मार्केट, कोकणातील सबमरीन प्रकल्प आणि आता अवघ्या महाराष्ट्राची ओळख आणि दुग्ध व्यवसायातील ब्रँड म्हणून ओळखला जाणारा महानंदा प्रकल्प आर्थिक त्रुटींचे कारण देऊन गुजरात स्थित नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डला देण्याचा निर्णय सरकारने केला आहे. या गुजरात धार्जिण्या सरकारला महाराष्ट्रातील बेरोजगारीशी आणि आर्थिक परिस्थितीशी काही एक देणं घेणं नाही असं म्हणत नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार घणाघात केला.
READ ALSO :
हेही वाचा..“यांच्या बोलण्यात वागण्यात कशातच राम उरलेला नाही”, भाजपाची ठाकरे पिता-पुत्रावर जहरी टिका
हेही वाचा.पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारीला करणार उपवास, सरयु नदीतही मोदी स्नान करणार
हेही वाचा..“सरकारमध्ये जरा संवेदना असतील तर.. नाही तर.. ” उद्धव ठाकरेंचा आझाद मैदानावरून सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…“तुम्ही लाख गाड्या द्याल, पण स्वाभिमानी माणूस फक्त शरद पवारच देऊ शकतात”, अजित पवारांवर जोरदार घणाघात
हेही वाचा…“महाराष्ट्राचा सत्यानाश करणाऱ्यांनो..,राज्याची जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही”