मुंबई : राज्यातील उद्योग-व्यवसाय तसेच महत्वाचे प्रकल्प गुजरात पळवले जात असतांना महाराष्ट्रातील आघाडीची महानंद डेअरीही केंद्राच्या नॅशनल डेव्हलपेंट बोर्डाला चालवायला देऊन नंतर गुजरातच्या पर्यायाने अमूलच्या घशात घालण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचं कारण देत महानंदर राष्ट्रीय दुद्ध विकास महामंडळाकडे सोपवण्याच्या हालचालींना वेग आलाय. त्यावरून आता काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…“निकामी सरकारमुळं महाराष्ट्र धर्मच धोक्यात आलाय”, कुणी केली सरकारवर जोरदार टिका ?
आधी वेदान्ता फॉक्सकॉन नंतर डायमंड मार्केट, कोकणातील सबमरीन प्रकल्प आणि आता अवघ्या महाराष्ट्राची ओळख आणि दुग्ध व्यवसायातील ब्रँड म्हणून ओळखला जाणारा महानंदा प्रकल्प आर्थिक त्रुटींचे कारण देऊन गुजरात स्थित नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डला देण्याचा निर्णय सरकारने केला आहे. या गुजरात धार्जिण्या सरकारला महाराष्ट्रातील बेरोजगारीशी आणि आर्थिक परिस्थितीशी काही एक देणं घेणं नाही असं म्हणत नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार घणाघात केला.
हेही वाचा…“काॅंग्रेस फुटेल अशा कंड्या पिकवल्या जाताहेत, पक्ष सोडून कोण जाईल? “
तसेच पुढे बोलतांना नाना पटोले म्हणाले की, आज राज्यातील तरुण बेरोजगारीच्या सावटाखाली जगत आहे, कधीकाळी भारताच्या नकाशावर आपल्या प्रगतीची छाप सोडणाऱ्या महाराष्ट्राची आजची आर्थिक स्थिती बिकट आहे, आधीच भाजपाने मोठे रोजगार देणारे सर्व प्रकल्प गुजरातला दिले आहेत आणि आणि त्यात जर दुग्ध व्यवसाय ही गुजरात कडे वळवणार असेल तर आता महाराष्ट्राच्या जनतेने या चालबाज सरकारला जाब विचारायलाच हवा. महाराष्ट्राचा सत्यानाश करणाऱ्यांनो राज्याची जनता तुम्हाला माफ करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, महानंद एनडीडीबीकडे सोपवण्यापुर्वी कर्मचारी कपात केली जाणार आहे. सध्या महानंदामध्ये सुमारे ९४० कर्मचारी आहेत. एनडीडीबीवर आर्थिक बोजा पडू नये म्हणून किमान ४५० कर्मचाऱ्यांची कपात केली जाईल. यासंदर्भात नागपूरच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तारात माहिती दिली होती.
आधी वेदान्ता फॉक्सकॉन नंतर डायमंड मार्केट ,कोकणातील सबमरीन प्रकल्प आणि आता अवघ्या महाराष्ट्राची ओळख आणि दुग्ध व्यवसायातील ब्रँड म्हणून ओळखला जाणारा महानंदा प्रकल्प आर्थिक त्रुटींचे कारण देऊन गुजरात स्थित नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ला देण्याचा निर्णय सरकारने केला आहे.
ह्या… pic.twitter.com/H1MB4aZldA
— Nana Patole (@NANA_PATOLE) January 3, 2024
READ ALSO :
हेही वाचा..“ते हिंदूत्व तुम्ही स्विकारणार का ?” आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल अन् जनतेला सवाल
हेही वाचा“फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा,” अमोल कोल्हेंची केंद्र सरकारकडे मागणी
हेही वाचा..“करोनानंतर मी काय मेलो का? झालो ना बरा?” आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
हेही वाचा…“महानंद ब्रॅंड गुजरातला हलवणार ;” मंत्री छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर, म्हणाले…
हेही वाचा…“तोपर्यंत अमोल कोल्हे, डरने की कोई बात नहीं”,राष्ट्रवादीच्या शिबीरातून जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांना टोला