मुंबई : राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर आता शरद पवार गट आणि अजित पवार गटात जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत. मागील सरकारच्या काळातील पालकमंत्री पदावरून जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात सध्या जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे.
हेही वाचा…“कष्टाने उभा केलेला महानंद ब्रॅंडही गुजरातच्या घशात जाणार,” विरोधकांची राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका
मला पालकमंत्रीपद देऊच दिलं नाही. ते फक्त एकनाथ शिंदे व अजित पवार मिळून ठरवत होते. मी अजित पवारांना स्वत: भेटून सांगितलं होतं की मला पालकमंत्री पद द्या. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: भेटून म्हणाले की जितेंद्र, आम्हाला रायगड हवं होतं. आम्ही तुम्हाला पालघर द्यायला तयार होतो. मी खास तुझ्यासाठी पालघर सोडलं होतं. पण ते म्हणाले अजित पवार कुठल्याही परिस्थितीत रायगड सोडायला तयार नाहीत. रायगड त्यांना आदिती तटकरे यांना द्यायचं आहे. असं आव्हाडांनी सांगितलंय.
हेही वाचा…“सत्तेत राहून भुजबळांनी केवळ नातेवाईकांनाच सत्तेचा वाटा दिला”, भुजबळांना ‘या’ समाजाचाही मोठा विरोध
दरम्यान, माझा प्रश्न त्यांना तेवढाच होता की मी काय ज्येष्ठ मंत्री नाही? मी या पक्षाचा कार्यकर्ता नाही ? मला करोना झाला आणि दोन तासांत तुम्ही पालकमंत्रीपदावरून काढता ? त्यानंतर करोना झालेल्या किती जणांना काढलं तुम्ही ? या पक्षात सावत्र होत का मी? का नाही सांगितलं की करोना झालाय तर बरा होईल आणि मग पुन्हा पालकमंत्रीपदाचा कार्यभार. मी झालो ना बरा ? मेलो नाही ना ? तुम्हाला स्वत: करोना झाला, का नाही राजीनामा दिला? मंत्रिमंडळातल्या अनेक सहकाऱ्यांना करोना झाला. मग त्यांचा राजीनामा का नाही घेतला? एकट्या जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा घेतला. असंही त्यांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…“महानंद ब्रॅंड गुजरातला हलवणार ;” मंत्री छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर, म्हणाले…
हेही वाचा…“तोपर्यंत अमोल कोल्हे, डरने की कोई बात नहीं”,राष्ट्रवादीच्या शिबीरातून जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांना टोला
हेही वाचा.“निकामी सरकारमुळं महाराष्ट्र धर्मच धोक्यात आलाय”, कुणी केली सरकारवर जोरदार टिका ?
हेही वाचा…“काॅंग्रेस फुटेल अशा कंड्या पिकवल्या जाताहेत, पक्ष सोडून कोण जाईल? “
हेही वाचा..महायुतीने लोकसभेसाठी कंबर कसली, १४ जानेवारीपासून महायुतीचे मेळावे, पाहा काय ठरली रणनिती ?