मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. येत्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत महायुतीचे मेळावे संपुर्ण राज्यात पार पडतील. तसेच राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४५ पेक्षा अधिक जागा महायुती जिंकेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. यावेळी अजित पवार गटाकडून सुनील तटकरे तर शिवसेना शिंदे गटाकडून मंत्री दादा भुसे उपस्थित होते.
हेही वाचा…मिरजेत ठाकरे अन् शिंदे गटाचे शिवसैनिक एकमेकांत भिडले, शिवसेना कार्यालयावरून मोठा राडा
आगामी लोकसभा निवडणुकीला आम्ही महायुती म्हणून सामारं जाण्याचा निर्धार केला आहे. १४ जानेवारीला राज्यातील सर्वच जिल्ह्यात एकाच वेळेला महायुतीचे मेळावे होणार आहेत. राज्यातील सहा प्रादेशिक विभागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. अशी माहिती राष्ट्रीवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी दिली आहे.
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून राज्यात गुन्हेगारी वाढली,” सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर जहरी टिका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्वाचे निर्णय केंद्र पातळीवर झालेत. तसेच राज्य पातळीवर देखील मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अनेक महत्वाचे निर्णय होत आहेत. राज्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहे. हेच मुद्दे घेऊन महायुतीचे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. तसेच विभाग पातळी, जिल्हा पातळी तसेच गाव पातळीवर देखील महायुतीचे मेळावे देखील आयोजित करण्यात येणार आहेत. असं दादा भूसे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, येत्या १४ जानेवारीपासून महायुतीचे मेळावे आयोजित करण्यात येणार असून महायुतीचे सर्व घटक पक्ष, तसेच मित्र पक्षाचे नेते या मेळाव्यांना हजर राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुती लोकसभा निवडणुका लढणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा प्रचंड विश्वास आहे. अनेकांनी मोदींनाच पुन्हा पंतप्रधान करावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही राज्यात ४५ पेक्षा अधिक जागा जिंकणार, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे. तसेच मोदींची लाट उत्तरेत अधिक असून खाली दक्षिणेत देखील हळू हळू सरकत आहे. त्यामुळे राज्यात अनेकजण महायुतीत येण्यासाठी तयार झाले आहेत. असंही बावनकुळे यांनी सांगितलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“कष्टाने उभा केलेला महानंद ब्रॅंडही गुजरातच्या घशात जाणार,” विरोधकांची राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका
हेही वाचा…“सत्तेत राहून भुजबळांनी केवळ नातेवाईकांनाच सत्तेचा वाटा दिला”, भुजबळांना ‘या’ समाजाचाही मोठा विरोध
हेही वाचा..“हेच जागा वाटपाचं समीकरण असणार”, अशोक चव्हाणांनी सांगितला आघाडीचा फॉर्म्युला
हेही वाचा…महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉम्युला ठरला का ? जयंत पाटलांची प्रतिक्रिया म्हणाले…
हेही वाचा..ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं..! ‘या’ लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडणार