अहमदनगर : राज्यात सध्या शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांची जोरदार चर्चा सुरू आहे. शिरूरचा आपला उमेदवार निवडून आणणरच असा इशारा अजित पवारांनी दिला. त्यानंतर अमोल कोल्हे यांनी संघर्ष यात्रेतून लोकांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत सरकारवर जोरदार टिका केली. आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमोल कोल्हे यांना बळ दिलं आहे.
हेही वाचा..“हेच जागा वाटपाचं समीकरण असणार”, अशोक चव्हाणांनी सांगितला आघाडीचा फॉर्म्युला
अहमदनगर येथे सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचं शिबीर मेळावा होत आहे. या मेळाव्यात जयंत पाटलांनी अमोल कोल्हे यांना घाबण्याचं कोणतंही कारण नसल्याचं सांगितलं. महाराष्ट्रात काही ठिकाणी आपण शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढला. अमोल कोल्हे यांनी पुणे जिल्ह्यात मोठा दौरा केला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अमोल कोल्हे यांना पाडण्याचा विडा काही जण उचलायला लागले आहेत. पण जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज व आई भवानीचा आशीर्वाद आपल्यामागे आहे, तोपर्यंत अमोल कोल्हे यांनी डरने की कोई बात नहीं. सगळा पक्ष तुमच्यामागे उभा राहिल असं जयंत पाटलांनी अमोल कोल्हे यांना सांगितलं.
हेही वाचा…महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉम्युला ठरला का ? जयंत पाटलांची प्रतिक्रिया म्हणाले…
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. अहमदनगर येथे ज्योत निष्ठेची लोकशाहीच्या संरक्षणाची अशी टॅगलाईन देत शरद पवार गटाचा शिबीर मेळावा पार पडत आहे. आज प्रदेशाध्यक्ष जंयत पाटलांच्या भाषणाने शिबीराची सुरूवात झाली तर शरद पवार यांच्या भाषणाने शिबीराचा शेवट होणार आहे. त्यावेळी जयंत पाटलांनी अमोल कोल्हे यांच्याबाबत बोलत सरकारला धारेवर धरलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा.“निकामी सरकारमुळं महाराष्ट्र धर्मच धोक्यात आलाय”, कुणी केली सरकारवर जोरदार टिका ?
हेही वाचा…“काॅंग्रेस फुटेल अशा कंड्या पिकवल्या जाताहेत, पक्ष सोडून कोण जाईल? “
हेही वाचा..महायुतीने लोकसभेसाठी कंबर कसली, १४ जानेवारीपासून महायुतीचे मेळावे, पाहा काय ठरली रणनिती ?
हेही वाचा…“कष्टाने उभा केलेला महानंद ब्रॅंडही गुजरातच्या घशात जाणार,” विरोधकांची राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका
हेही वाचा…“सत्तेत राहून भुजबळांनी केवळ नातेवाईकांनाच सत्तेचा वाटा दिला”, भुजबळांना ‘या’ समाजाचाही मोठा विरोध