मुंबई : राज्यात आगामी महिन्यात लोकसभा निवडणुकांचं बिगूल वाजणार आहे. त्यासाठी राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू करून दिली आहे. यातच काॅंग्रेसचे ९ नेते आणि शिंदे गटाचे ७ खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट राजकीय वर्तुळात करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आणखी राजकीय भूंकप होणार का ? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावरून काॅंग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा..ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं..! ‘या’ लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडणार
काॅंग्रेस फुटेल अशा कंड्या पिकवल्या जात आहेत. काही इन्फ्लुअन्सर्स ना हाताशी धरून वातावरण निर्मिती केली जात आहे. प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळे असल्याने महायुतीचे धाबे दणाणले आहे. विविध सर्वेक्षण संस्थांनी केलेले अंदाज पाहता महायुतीची पीछेहाट होताना दिसतेय. अशा स्थितीत निवडून येण्याची शक्यता आणि क्षमता असताना आपला पक्ष सोडून कोण जाईल?, हा साधा विचार तरी अफवा पसरवणाऱ्यांनी करायला हवा. अशी खोचक टिप्पणी यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
हेही वाचा…मिरजेत ठाकरे अन् शिंदे गटाचे शिवसैनिक एकमेकांत भिडले, शिवसेना कार्यालयावरून मोठा राडा
दरम्यान, काॅंग्रेस फुटेल या अफवा आहेतच परंतु त्याउलट एकनाथ शिंदे यांच्या अपात्रतेबाबत निर्णय झाला तर महायुती सरकारच पडेल याबाबत जनतेची खात्री होत आहे. त्यामुळे हिंमत असेल तर विधानसभा अध्यक्षांनी सदसदविवेक बुद्धीला स्मरून अपात्रतेच्या याचिकेवरचा निर्णय देऊन दाखवावा, असं आवाहन देत वेळ कशाला लावताय? असा सवालही यशोमती ठाकूर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना केला आहे.
काँग्रेस फुटेल अशा कंड्या पिकवल्या जात आहेत. काही इन्फ्लुअन्सर्स ना हाताशी धरून वातावरण निर्मिती केली जात आहे. प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळे असल्याने महायुतीचे धाबे दणाणले आहे. विविध सर्वेक्षण संस्थांनी केलेले अंदाज पाहता महायुतीची पीछेहाट होताना दिसतेय. अशा स्थितीत निवडून…
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) January 2, 2024
READ ALSO :
हेही वाचा..महायुतीने लोकसभेसाठी कंबर कसली, १४ जानेवारीपासून महायुतीचे मेळावे, पाहा काय ठरली रणनिती ?
हेही वाचा…“कष्टाने उभा केलेला महानंद ब्रॅंडही गुजरातच्या घशात जाणार,” विरोधकांची राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका
हेही वाचा…“सत्तेत राहून भुजबळांनी केवळ नातेवाईकांनाच सत्तेचा वाटा दिला”, भुजबळांना ‘या’ समाजाचाही मोठा विरोध
हेही वाचा..“हेच जागा वाटपाचं समीकरण असणार”, अशोक चव्हाणांनी सांगितला आघाडीचा फॉर्म्युला
हेही वाचा…महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉम्युला ठरला का ? जयंत पाटलांची प्रतिक्रिया म्हणाले…