मुंबई : राज्यातील उद्योग-व्यवसाय तसेच महत्वाचे प्रकल्प गुजरात पळवले जात असतांना महाराष्ट्रातील आघाडीची महानंद डेअरीही केंद्राच्या नॅशनल डेव्हलपेंट बोर्डाला चालवायला देऊन नंतर गुजरातच्या पर्यायाने अमूलच्या घशात घालण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचं कारण देत महानंद राष्ट्रीय दूग्ध विकास महामंडळाकडे सोपवण्याच्या हालचालींना वेग आलाय. यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टिका केली आहेच, परंतु मंत्री छगन भुजबळ यांनी देखील यावरून सरकारला घरचा आहेर दिला आहे.
हेही वाचा…“सत्तेत राहून भुजबळांनी केवळ नातेवाईकांनाच सत्तेचा वाटा दिला”, भुजबळांना ‘या’ समाजाचाही मोठा विरोध
महानंद आणि सरकारने जर चांगलं काम केल असतं तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. असं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. तसेच महानंद आणि सरकारने केलेल्या कामांमध्ये त्रुटी आल्या आहेत. त्यामुळेच आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. अमुलच कामं जगात वेगळ्या पद्धतीने समोर आलं आहे. परंतु महानंद सारख्या मोठ्या संस्थांचं काम महाराष्ट्रातून दुसरीकडे जावं हे माझ्या मनाला पटत नाही. असंही ते म्हणाले.
हेही वाचा..“हेच जागा वाटपाचं समीकरण असणार”, अशोक चव्हाणांनी सांगितला आघाडीचा फॉर्म्युला
दरम्यान, गुजरातच्या ओंजळीने पाणी पिणाऱ्या नाकर्त्या सरकारमुळे गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राच्या हक्काचे प्रकल्प गुजरातमध्ये गेलेच, पण आता सहकाराची जननी असलेल्या महाराष्ट्रातून महानंद सारखी सहकारी संस्थाही गुजरातस्थित राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाला चालवायला देऊन आता दूधही गुजरातच्या हाताने पिण्याची वेळ या सरकारने महाराष्ट्रावर आणली असल्याचा जोरदार घणाघात रोहित पवार यांनी सरकारवर केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तोपर्यंत अमोल कोल्हे, डरने की कोई बात नहीं”,राष्ट्रवादीच्या शिबीरातून जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांना टोला
हेही वाचा.“निकामी सरकारमुळं महाराष्ट्र धर्मच धोक्यात आलाय”, कुणी केली सरकारवर जोरदार टिका ?
हेही वाचा…“काॅंग्रेस फुटेल अशा कंड्या पिकवल्या जाताहेत, पक्ष सोडून कोण जाईल? “
हेही वाचा..महायुतीने लोकसभेसाठी कंबर कसली, १४ जानेवारीपासून महायुतीचे मेळावे, पाहा काय ठरली रणनिती ?
हेही वाचा…“कष्टाने उभा केलेला महानंद ब्रॅंडही गुजरातच्या घशात जाणार,” विरोधकांची राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका