मुंबई : एका हिंदू सणात, बिंदूकीचा धाक दाखवून घाबवणाऱ्या माणसाला अध्यक्ष केलं जातंय? हे हिंदूत्व तुम्ही आम्ही आपण स्वीकारणार आहोत का ? असा सवाल ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात आदित्य ठाकरे यांनी मागील काही घटनांचा उल्लेख करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टिका केलीय.
हेही वाचा…“काॅंग्रेस फुटेल अशा कंड्या पिकवल्या जाताहेत, पक्ष सोडून कोण जाईल? “
एकीकडे शहरं लुटली जात आहेत, दुसरीकडे ग्रामीण भागाला कुठलीच मदत मिळत नाहीये आणि गुन्हेगार मात्र मोकाट सुटले आहेत. एका आमदाराचा मुलगा एका व्यावसायिकाचं अपहरण करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला. परंतु आजपर्यंत कोणतीही कारवाई केली गेलेली नाही. आणखी एक आमदार गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक रोखतांना कॅमेऱ्यात पकडला गेला आणि त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची बातमीही आपण ऐकली. पण त्याच आमदाराला त्याच्या ह्या उद्दामपणाचं कौतूक म्हणून आता सिद्धिविनायक गणेश मंदिर ट्रस्टचं अध्यक्ष बनवण्यात आलंय. एका हिंदू सणात, बिंदूकीचा धाक दाखवून घाबवणाऱ्या माणसाला अध्यक्ष केलं जातंय? हे हिंदूत्व तुम्ही आम्ही आपण स्वीकारणार आहोत का ? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा..महायुतीने लोकसभेसाठी कंबर कसली, १४ जानेवारीपासून महायुतीचे मेळावे, पाहा काय ठरली रणनिती ?
काही कॅबिनेट मंत्र्यांनी महिला खासदारांना शिवीगाळ केली, काही आमदार फोनवर अधिकाऱ्याला धमकावताना रेकॉर्ड झाले आहेत. परंतु ह्या सर्व कृत्यांसाठी त्यांना बक्षीस म्हणून बढती देण्यात आली. असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा साधला. यातच आपल्या पत्रात आदित्य ठाकरे यांनी राज्यातील गुजरात गेलेल्या प्रकल्पांचाही उल्लेख केला आहे. तसेच या सर्व मूळ समस्या लपवण्यासाठी, आत्ताच्या राजवटीने आपल्याला सततच्या धार्मिक, जातीय दंगली, नागरी अशांतता आणि टिव्ही वादविवादांमध्ये व्यस्त ठेवल्याचंही त्यांनी सांगितलं. यातच महागाई, भ्रष्टाचार बेरोजगारी आणि इतर समस्यांकडून लक्ष वळवण्यासाठी आपल्याला जाणूनबूजून कार्यक्रमांमध्ये गुंतवून ठेवलं जातंय. असंही त्यांनी सांगितले.
दरम्यान, सत्य हे आहे की, आपल्या भुतकाळाबद्दलच्या भांडणावर त्यांचं भविष्य अवलंबून आहे. पण आपलं भविष्य आपण आपल्या उद्यासाठी, काय करणार आहोत. यावर अवलंबून आहे. ज्यांनी लोभापायी अभिमान, वैभव लुटण्याचा प्रयत्न ही महाराष्ट्रविरोधी राजवट करत आहे, अशा राजवटीत तुमचं उज्जल भविष्य घडू शकेल असं तुम्हाला वाटतं का ? असाही सवाल त्यांनी केलाय. तसेच लोकशाही व्यवस्थेवर चालणारं राज्य म्हणून नावाजलेल्या आपल्या महाराष्ट्रात राज्यात हे आता लोकशाही असल्याचं ढोंगही करत नाहीत. अशा राजवटीत तुम्ही रहायला तयार आहात का ? असंही त्यांनी म्हटलं.
माझे महाराष्ट्रवासीयांना पत्र pic.twitter.com/OMv7LB9O2K
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 3, 2024
READ ALSO :
हेही वाचा“फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा,” अमोल कोल्हेंची केंद्र सरकारकडे मागणी
हेही वाचा..“करोनानंतर मी काय मेलो का? झालो ना बरा?” आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
हेही वाचा…“महानंद ब्रॅंड गुजरातला हलवणार ;” मंत्री छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर, म्हणाले…
हेही वाचा…“तोपर्यंत अमोल कोल्हे, डरने की कोई बात नहीं”,राष्ट्रवादीच्या शिबीरातून जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांना टोला
हेही वाचा.“निकामी सरकारमुळं महाराष्ट्र धर्मच धोक्यात आलाय”, कुणी केली सरकारवर जोरदार टिका ?