मुंबई : तुम्ही कुपोषित बालकांना आहार देता, पण तुम्हाला सरकारने कुपोषित केलं आहे. तुम्हाला काहीच मिळत नाहीय. त्यामुळे सरकारमध्ये जरा संवेदना असतील तर ते तुमच्या मागण्या मान्य करतील. नाही तर आमचं सरकार तुम्ही आणणारच आहात. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करणार असं आश्वासन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आझाद मैदानावर अंगवाडी सेविकांना दिलं.
हेही वाचा…“महानंद ब्रॅंड गुजरातला हलवणार ;” मंत्री छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर, म्हणाले…
अंगणवाडी सेविकांनी मागील काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारलं आहे. आज उद्धव ठाकरे यांनी आंदोलक अंगणवाडी सेविकांची भेट घेतली आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आज मी तुमच्यासाठी तुमच्यासोबत नेता म्हणून नाही तर भाऊ म्हणून आलो आहे. असंख्य ज्योती जेव्हा एकत्र येतात, तेव्हा मशाल पेटते. ही मशाल कुणालाही खाक करू शकते. समाजाची सेवा करणारे तुमचे हात सरकारच्या कानाखाली आपटले तर विचार करा. आवाज केवढा येईल. आमचं सरकार पडलं नसतं. तर तुम्हाला इथे आंदलोनासाठी यावं लागलं नसतं. असंही ठाकरे म्हणाले.
हेही वाचा…“तोपर्यंत अमोल कोल्हे, डरने की कोई बात नहीं”,राष्ट्रवादीच्या शिबीरातून जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांना टोला
दरम्यान, भारताला खऱ्या अर्थाने सुदृढ अंगणवाडी सेविका करतात. परंतु यांच्याकडे सरकार आणण्यासाठी खोके आहेत. पण आशाताई- अंगणवाडी सेविकांना द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत. असं म्हणत नवीन वर्षाच्या शुभेच्छा नकोत , मला निश्चय पाहिजे की माझं सरकार मी निवडणार. कोरोनामध्ये माझं नाव जरूर झालं. पण त्याचं खरं श्रेय अंगणवाडी सेविकांना आहे. कारण त्या काळात तुम्ही घरोघरी जाऊन लोकांची काळजी घेत होतात. अशी प्रशंसाही ठाकरेंनी केली.
READ ALSO :
हेही वाचा…“तुम्ही लाख गाड्या द्याल, पण स्वाभिमानी माणूस फक्त शरद पवारच देऊ शकतात”, अजित पवारांवर जोरदार घणाघात
हेही वाचा…“महाराष्ट्राचा सत्यानाश करणाऱ्यांनो..,राज्याची जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही”
हेही वाचा..“ते हिंदूत्व तुम्ही स्विकारणार का ?” आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल अन् जनतेला सवाल
हेही वाचा“फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा,” अमोल कोल्हेंची केंद्र सरकारकडे मागणी
हेही वाचा..“करोनानंतर मी काय मेलो का? झालो ना बरा?” आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल