अहमदनगर : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांना ८० गाड्या देण्यात आल्या. यावरून आता शरद पवार गटाच्या नेत्यांकडून अजित पवारांवर जोरदार टिका केली जात आहे. तुम्ही लाख गाड्या द्याल पण स्वाभिमानी माणूस आणि कार्यकर्ते फक्त शरद पवार साहेबचं देऊ शकतात, असं म्हणत शरद पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला. अहमदनगर येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचं शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. त्यावेळी त्या बोलत होत्या.
हेही वाचा…“तोपर्यंत अमोल कोल्हे, डरने की कोई बात नहीं”,राष्ट्रवादीच्या शिबीरातून जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांना टोला
“या पठ्ठ्याने कधी बहरने सोडले नाही, मागे वळून कोणी पाहिलं नाही, म्हणून माळ्यावरच्या चाफ्याचे काही अडले नाही, सख्या पानांनीही साथ सोडली म्हणून पट्ट्याने कधी बहरने सोडलं नाही” तुम्ही लाख गाड्या द्याल, गाड्या प्रत्येक दुकानात आणि शोरूम मध्ये आहेत, पण स्वाभिमानी माणूस आणि कार्यकर्ते कोणत्या दुकानात मिळत नाही तो छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात मिळतो. आणि तो पवार साहेबांसोबत आहे. असं सक्षणा सलगर म्हणाल्या.
हेही वाचा…“निकामी सरकारमुळं महाराष्ट्र धर्मच धोक्यात आलाय”, कुणी केली सरकारवर जोरदार टिका ?
पुढे सुप्रिया सुळेंची तुलना मुक्ताईबरोबर केली. त्या म्हणाल्या की, संपूर्ण महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे. संत तुकाराम, संत ज्ञानदेव आहेत, पण याच महाराष्ट्रात संत मुक्ताई सुद्धा होऊन गेली जी आपल्या दादाला नेहमीच संकटाच्या काळात मागच्या पडद्याआड का होईना, पण सांगत होती, ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा दात जिभेने चावली बत्तीशी तोडली कोणी’ आणि हीच मुक्ताई सुप्रियाताई आहेत. कुणीतरी सांगतात तुम्ही निवडून कोणाच्या जीवावर आलात. आम्ही पवार साहेबांसोबत का थांबलोत ? आमच्याकडे कारखाना नाही, आमच्याकडे संस्था नाही, आमच्याकडे अंगणवाडी नाही, पण आमच्याकडे स्वाभिमान आहे. असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, कष्टाची भाकरी खाऊन पक्षाचे काम करत आहोत, कारण पवार साहेबांसारखा महायोद्धा खरा बाहुबली आम्हाला कोणासमोर झुकू द्यायचा नाहीये. या वयात ते लढतायेत ही तुमच्या माझ्यासाठी प्रेरणा आहे. आज हे सगळे कार्यकर्ते आलेले आहेत, गाड्या द्या नाहीतर चॉपर द्या, काही फरक पडत नाही, परंतु पवार साहेबांना मानणारा कार्यकर्ता या मातीत रुजलेला आहे आणि म्हणून त्यांच्यासोबत आपण खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे. महाराष्ट्राला गुजरात चालवू शकत नाही ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे; शाहू, फुले, आंबेडकर, सावित्री आणि अहिल्यादेवी होळकरांची भूमी आहे. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथील शिबिरात सक्षणा सलगर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, युवती प्रदेशाध्यक्षा श्रीमती सक्षणा सलगर
“या पठ्ठ्याने कधी बहरने सोडले नाही, मागे वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळ्यावरच्या चाफ्याचे काही अडले नाही, सख्या पानांनीही साथ सोडली म्हणून पट्ट्याने कधी बहरने सोडलं नाही” तुम्ही लाख गाड्या द्याल, गाड्या… pic.twitter.com/KM0yinHwU8
— NCP (@NCPspeaks) January 3, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“महाराष्ट्राचा सत्यानाश करणाऱ्यांनो..,राज्याची जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही”
हेही वाचा..“ते हिंदूत्व तुम्ही स्विकारणार का ?” आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल अन् जनतेला सवाल
हेही वाचा“फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा,” अमोल कोल्हेंची केंद्र सरकारकडे मागणी
हेही वाचा..“करोनानंतर मी काय मेलो का? झालो ना बरा?” आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
हेही वाचा…“महानंद ब्रॅंड गुजरातला हलवणार ;” मंत्री छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर, म्हणाले…