नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने मोठी रणनिती आखली आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यातच लोकसभा निवडणुकांच्या अगोदर दररोज ५०,००० भाविकांना राम लल्लाचं दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था भाजपकडून करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यातच आता २२ जानेवारीला पंतप्रधान उपवास करणार असल्याचीही माहिती सुत्रांनी दिली आहे.
हेही वाचा..“करोनानंतर मी काय मेलो का? झालो ना बरा?” आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
येत्या २२ जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येत पार पडणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष व्रत्त ठेवणार आहेत. याआधी काशी विश्ननाथ कॅरिडोरचं उद्घाटन केलं होतं. त्यावेळी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवसभर उपवास ठेवला होता. त्यानंतर काशी विश्ननाथ यांचं दर्शन घेण्याआधी गंगा स्नान केलं होतं. आता राम मंदिराच्या सोहळ्यासाठी पंतप्रधान २२ जानेवारी रोजी उपवास ठेवणार आहे. यातच मोदी शरयु नदीत स्नान करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“महानंद ब्रॅंड गुजरातला हलवणार ;” मंत्री छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर, म्हणाले…
दरम्यान, २२ जानेवारीच्या सोहळ्यासाठी देशभरातून अनेकांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला अनेक साधू महंत, राजकारणी, तसेच महान व्यक्तींना बोलवण्यात आलं आहे. यातच त्याची जय्यत तयारी सध्या अयोध्यात सुरू झाली आहे. यातच या दिवशी मोठी प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यावरून राम लल्लाचं मंदिर तिथेचं असणार आहे. तुमच्या सवडीनुसार अयोध्येत या. सध्या मंदिराचं काम सुरू आहे. त्यांची अडचण वाढवू नका. असं आवाहन मोदींनी केलं होतं.
READ ALSO :
हेही वाचा..“सरकारमध्ये जरा संवेदना असतील तर.. नाही तर.. ” उद्धव ठाकरेंचा आझाद मैदानावरून सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…“तुम्ही लाख गाड्या द्याल, पण स्वाभिमानी माणूस फक्त शरद पवारच देऊ शकतात”, अजित पवारांवर जोरदार घणाघात
हेही वाचा…“महाराष्ट्राचा सत्यानाश करणाऱ्यांनो..,राज्याची जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही”
हेही वाचा..“ते हिंदूत्व तुम्ही स्विकारणार का ?” आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल अन् जनतेला सवाल
हेही वाचा“फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा,” अमोल कोल्हेंची केंद्र सरकारकडे मागणी