मुंबई : कागदावरच आरेचे जंगल घोषित करणारे, आपल्या अंहकारासाठी आरेतील मेट्रो कारशेड अडवून ठेवणारे, मुंबईतील कचरा, सांडपाणी याची विल्हेवाट न लावणारे, प्रदुषणकारी प्रकल्पांचा दंड माफ करणारे हेच तथाकथित पर्यावरण प्रेमी आणि तत्कालीन पर्यावरण मंत्री युवराज मुंबईला दूषित करण्यास जबाबदार आहेत, असं म्हणत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. आज आदित्य ठाकरे यांनी पत्राद्वारे राज्य सरकारवर जहरी टिका केली. त्यावर आता आशिष शेलारांनी पलटवार केला आहे.
हेही वाचा…“फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा,” अमोल कोल्हेंची केंद्र सरकारकडे मागणी
प्रदूषण, भ्रष्टाचार, गलथान कारभार, ढासळत चाललेल्या पायाभूत सुविधा, सरकारी रूग्णालयांमध्ये औषधांचा अभाव, महाराष्ट्रातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाची भीषण अवस्था यांसारख्या अनेक समस्यांना आपण तोंड देत आहोत. एम.टी. एच.एल आणि दिघा रेल्वे स्थानकासारख्या पायाभूत सुविधा अनेक महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतित्रेत आहेत. या सर्व मूळ समस्या लपवण्यासाठी आत्ताच्या राजवटीने आपल्याला सततच्या धार्मिक, जातीय दंगली, नागरी अशांतता आणि टिव्ही वादविवादांमध्ये व्यस्त ठेवलं आहे. अशी टिका आदित्य ठाकरे यांनी केली होती.
हेही वाचा..“करोनानंतर मी काय मेलो का? झालो ना बरा?” आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
त्यावर महाराष्ट्रात प्रकल्प आला की विरोध करणारे, कटकमिशनच्या नादात मुंबई महापालिका लुटणारे, मराठी माणसाच्या घरांमध्ये ही कमिशन खाणारे, कोविडमध्ये मयताच्या बॉंडी बॅंगमध्ये कमिशन खाणारे, रूग्णांच्या औषध, कामगारांच्या खिचडीत कटकमिशन कमावणारे, अडीच वर्षात मंत्रालयातही न जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र आज मगरीचे अश्रू ढाळत आहेत. असा घणाघात आशिष शेलारांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलाय.
दरम्यान, युवराज म्हणजे तळ्या काठी खोटे ध्यान लावून बसणाऱ्या ढोंघी बगळ्यांच्या टोळीचे म्होरके आहेत. यांच्या बोलण्यात वागण्यात कशातच राम उरलेला नाही. अशी टिका देखील आशिष शेलारांनी आदित्य ठाकरे यांच्यावर पत्राद्वारे केलीय.
महाराष्ट्रातील तमाम जनतेला आमचे आवाहन..
सावधान.!!
युवराज म्हणजे तळ्या काठी “खोटे ध्यान” लावून बसणाऱ्या ढोंगी “बगळ्यांच्या टोळीचे म्होरके आहेत!
यांच्या बोलण्यात, वागण्यात कशातच “राम” उरलेला नाही!! @BJP4Mumbai @BJP4Maharashtra https://t.co/xkt3O4NQuk pic.twitter.com/fUHOWqoRNe
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 3, 2024
माझे महाराष्ट्रवासीयांना पत्र pic.twitter.com/OMv7LB9O2K
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 3, 2024
READ ALSO :
हेही वाचा.पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारीला करणार उपवास, सरयु नदीतही मोदी स्नान करणार
हेही वाचा..“सरकारमध्ये जरा संवेदना असतील तर.. नाही तर.. ” उद्धव ठाकरेंचा आझाद मैदानावरून सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…“तुम्ही लाख गाड्या द्याल, पण स्वाभिमानी माणूस फक्त शरद पवारच देऊ शकतात”, अजित पवारांवर जोरदार घणाघात
हेही वाचा…“महाराष्ट्राचा सत्यानाश करणाऱ्यांनो..,राज्याची जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही”
हेही वाचा..“ते हिंदूत्व तुम्ही स्विकारणार का ?” आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल अन् जनतेला सवाल