मुंबई : महाराष्ट राज्य सहकारी दुध महासंघ मर्यादित अर्थातच महानंदच्या संचालक मंडळाने गुजरातमध्ये मुख्यालय असलेल्या राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे कारभार देण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे राज्याचे वैभव असलेली महानंद एनडीडीबीच्या घशात जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे. राज्यामध्य अमुलच्या पायघड्या घालण्यासाठीही हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप राज्य दुग्ध उत्पादक संघर्ष समितीने केला आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटानेही राज्य सरकारवर जहरी टिका केली आहे.
हेही वाचा…“सहकार बुडवणारे सरकार, सरकारच्या महाराष्ट्रद्रोही कृतीचा तीव्र निषेध”, राज्यातील विरोधक आक्रमक
राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत. यावरून विरोधकांनी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरून ठाकरे गटानेही सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. डोळे मिटून दुध पितंय कोण? मिंधे-भाजप बोके दोन, असं म्हणत महाराष्ट्राचा महानंद ब्रॅंड गुजरातला आंदण अशी टिका देखील ठाकरे गटाने केली आहे.
हेही वाचा..“यांच्या बोलण्यात वागण्यात कशातच राम उरलेला नाही”, भाजपाची ठाकरे पिता-पुत्रावर जहरी टिका
दरम्यान, आधी वेदान्ता फॉक्सकॉन नंतर डायमंड मार्केट, कोकणातील सबमरीन प्रकल्प आणि आता अवघ्या महाराष्ट्राची ओळख आणि दुग्ध व्यवसायातील ब्रँड म्हणून ओळखला जाणारा महानंदा प्रकल्प आर्थिक त्रुटींचे कारण देऊन गुजरात स्थित नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डला देण्याचा निर्णय सरकारने केला आहे. या गुजरात धार्जिण्या सरकारला महाराष्ट्रातील बेरोजगारीशी आणि आर्थिक परिस्थितीशी काही एक देणं घेणं नाही असं म्हणत काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील राज्य सरकारवर घणाघात केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“महाराष्ट्राची महानंदा कोण विकत आहे?” इतिहास दाखवत राऊतांचा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना सवाल
हेही वाचामंत्री आहे की गुंड ? लोकांना कुत्र्यासारखं मारा, सत्तारांचा पोलिसांना आदेश, गौतमी पाटलाच्या कार्यक्रमात मोठा राडा
हेही वाचा…“श्रीराम शाकाहारी नव्हता, मांसाहारी होता,” आव्हाडांच्या वक्तव्यानंतर मोठा वाद, गुन्हा दाखल
हेही वाचा“आपल्याकडे ब्रॅंड शोधण्याची गरज नाही, आपला ब्रॅंड फक्त शरद पवार”
हेही वाचा…“22 जानेवारीला महाराष्ट्रात दारू आणि मास बंदी करा,” भाजपच्या ‘या’ आमदाराने केली मागणी