मुंबई : महाराष्ट्रात वाढीव वीजबिलाचा मुद्दा प्रचंड तापला आहे, याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वीज बिलाबाबत सर्वसामान्यांना दिलासा देऊ असं म्हटलं होत परंतु प्रत्यक्षात सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वीज बिल भराव लागत आहे.
सरकारकडून लोकांना कुठलाही दिलासा देण्यात आलेला नाही, महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रवासीयांशी विश्वासघात केली असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्रातील ऊर्जा विभागाची स्थिती अतिशय उत्तम असून त्याला नीट चालवण्यासाठी मंत्री नितीन राऊत कमी पडत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी सरकारवर केला आहे.
एखाद्या सामान्य माणसाने ५ वर्ष जरी घरातील सर्व उपकरण वापरली तरी तेवढे बिल येणार नाही एव्हडं बिल एका महिन्याचे आले आहे, सरकार जनतेची आर्थिक लूट करत असून सातत्याने हे सरकार जनतेशी विश्वासघात करत असल्याची जहरी टीका फडणवीसांनी केली आहे.
Read Also ;
फडणवीसांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही: जयंत पाटील
भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
शिवसेनेच्या वचननाम्यातील ३० टक्के विज दर कपातीचे आश्वासन कागदावरच
“खोटे बोलण्याच्या आणि जनतेला फसवण्याच्या सवयीमुळे जनतेने भाजपला सत्तेवरून दूर केले “
‘लातों के भूत बातों से नहीं मानते” म्हणत मनसेचा आंदोलनाचा इशारा