मुंबई : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी १२७ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचे आरोप केले आहेत. तसेच, त्यांच्याविरोधात असलेले तब्बल २७०० पानी पुरावे देखील त्यांनी आयकर विभागाकडे सादर केले. यांनतर आता यासंदर्भात मोठी घडामोड घडत असून, सोमय्या यांनी आपल्याला घरातून अटक करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ठाकरे सरकारची दडपशाही, माझा घराखाली पोलिसांची गर्दी, माझा कोल्हापूर दौरा थांबविण्यासाठी, हसन मुश्रीफ घोटाळा दाबण्यासाठी घरातून अटक करण्याचे गृहमंत्री आदेश
मी मुलुंड निलम नगर हून ५.३० ला निघणार, आदी गिरगाव चौपाटी गणेश विसर्जन आणि तिथून ७.१५ वाजता CSMT स्टेशन महालक्ष्मी एक्स्प्रेस pic.twitter.com/lct8lx580v
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 19, 2021
याबद्दलचा व्हिडिओ त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला असून, यात त्यांनी, ‘ठाकरे सरकारची दडपशाही, माझ्या घराखाली पोलिसांची गर्दी, माझा कोल्हापूर दौरा थांबविण्यासाठी, हसन मुश्रीफ घोटाळा दाबण्यासाठी घरातून अटक करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश. मी मुलुंड निलम नगर हून ५.३० ला निघणार, आदी गिरगाव चौपाटी गणेश विसर्जन आणि तिथून ७.१५ वाजता CSMT स्टेशन महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला जाणार आहे,’ असं ते म्हणाले आहेत.
‘अजित पवारांचा खरा चेहरा उघडा पडला!’
सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप केला असून, आज ते पुन्हा एकदा कोल्हापूरला जाणार होते. मुश्रीफ यांच्या बेनामी साखर कारखान्याची माहिती ते कोल्हापूरकरांसमोर मांडणार होते. मात्र, त्याआधीच त्यांच्या घराबाहेर राज्य सरकारने पोलिसांचा मोठा फौजफाटा उभा केला आहे. तर दुसरीकडे मुश्रीफ यांनी १०० कोटी रुपयांचा दावा न्यायालयात सादर करण्याचा इशारा दिला होता.
राज्य मंत्री नाही, तर प्रणिती शिंदे कॅबिनेट मंत्री होणार?
भाजप नेते किरीट सोमय्या एकापाठोपाठ एक ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचे घोटाळे आणि गैर प्रकरणे बाहेर काढत असून, त्यांनी आत्तापर्यंत अनिल परब, अनिल देशमुख, भावना गवळी, हसन मुश्रीफ, मिलींद नार्वेकर, मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे ठाकरे, प्रताप सरनाईक या नेत्यांवर आरोप केले आहेत. तसेच त्यांनी, ठाकरे सरकारच्या ११ घोटाळेबाज नेत्यांची नावे सांगितली आहेत. त्यांनतर ते सातत्याने महाविकास आघाडी सरकारकडून याच पार्श्वभूमीवर त्यांना केंद्र सरकारकडून झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली गेली आहे.
Read Also :