मुंबई : हर हर महादेव चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड केली असल्याचा दावा माजी खासदार संभाजी राजे यांनी केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटाविरोधात आक्रमक भूमिका घेत ठाण्यातील थेटरमध्ये जाऊन या चित्रपटाचा शो बंद केला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रक्षेकाला मारहाण केल्याप्रकरणी आव्हाडांना अटक करण्यात आली, आणि आज त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी कोर्टाने सुनावली आहे.
मग आता प्रश्न विचारल्यावर मिरच्या का झोंबतायत ? काॅंग्रेसचा तिखट सवाल
जितेंद्र आव्हाड यांना काल ठाण्यातील वर्तकनगर पोलीसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना रातभर तुरूंगात ठेवण्यात आलं. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं आणि या प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली. या सुनावणी दरम्यान त्यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढचे दिवस आव्हाड कोठडीतच राहणार आहेत.
“राष्ट्रवादीची साथ सोडा सांगून कंटाळलो, अन् निर्णय घेतला”; किर्तीकरांचा शिंदे गटात प्रवेश
जितेंद्र आव्हाड यांच्या वकिलांनी त्यांच्या जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. तसेच त्यांच्याबाजून अॅड प्रशांत कदम यांनी आव्हाडांच्या अटकेवर युक्तिवाद केला. तसेच आव्हाड आणि इतर लोकांवर दाखल केलेले गुन्हे चुकीचे असल्याचा युक्तिवाद देखील कदम यांनी केला. परंतु न्यायालयाने त्यांना पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली.
“फडणवीस काल म्हणाले की, द्वेषाचं राजकारण थांबलं पाहिजे, अन् आज आव्हाडांना अटक”
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांना काल पोलिसांनी अटक केली. त्यानंतर लगचेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वर्तकनगर पोलिस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केले. रात्रभर चाललेल्या या आंदोलन कर्त्यांना त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच आज जितेंद्र आव्हा़ड यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यानंतर राष्ट्रवादी आता मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read also
- अन् राहुल गांधींसमोरच मांडला कुस्तीचा फड..! कोल्हापुरचे रांगडे गडी एकमेकांत लढले
- “महाराष्ट्राच्या हातून अजून एक प्रकल्प गेला, विरोधकांचा सरकारवर निशाणा
- “राष्ट्रवादीचे नेते सत्तेशिवाय राहु शकत नाही, अनेक नेते भाजप अन् शिंदे गटात येणार”
- किर्तीकरांनी पक्ष सोडला, राऊतांची प्रतिक्रिया म्हणाले, “उद्यापासून लोक त्यांनाही…”;
- “आमच्या पोरांना लग्नाआधी पोरं होतात”; राष्ट्रवादीच्या माजी आमदारांचं वादग्रस्त वक्तव्य