पुणे : निवडणुकीत प्रत्येकाला उभं राहायचं असतं. त्यासाठी प्रत्येकजण तिकीटाची मागणी करतो. पण सर्वांनाच तिकीट देणं शक्य नसतं. त्यामुळे तिकीट न मिळाल्याने थोडी बहुत अस्वस्थता असते. मात्र गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चांगली कामं केली आहेत. त्यांच्या कामावर जनता खूष आहे. आम्ही भाजपलाच मतदान करून पुन्हा सत्तेत बसवणार असं तिथली जनताच म्हणत आहे, असा दावा चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला आहे.
महावितरणाविरोधात आंदोलन करण्याचा भाजपला अधिकार नाही – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
गोव्याच्या बाबत कोणीही मनातल्या मनात मांडे खाऊ नये. गोव्यात भाजपचीच सत्ता येणार आहे, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावतानाच गोव्यात भाजप 22 जागांवर विजयी होईल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचंही अभिनंदन केलं. मी मुख्यमंत्र्यांवर बोलत होतो. तेव्हा त्यांची तब्येत बरी व्हावी म्हणून प्रार्थना करत होतो. मात्र, ते आजारी असेपर्यंत मुख्यमंत्रीपद रिकामं ठेवू नये किंवा घरातच कुणाला तरी पद द्यावं, असं मी म्हटलं होतं, असं पाटील म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? देवेंद्र फडणवीसांचा संतप्त सवाल
पुढे बोलताना ते म्हणाले, 12 आमदारांच्या निलंबनावरूनही त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. राज्य सरकारने 12 आमदारांचं निलंबन करून संविधानाच्या गाभ्यालाच हात घातला आहे. हे मी सांगत नाहीये. सर्वोच्च न्यायालयानेच हे म्हटलं आहे. कोणत्याही आमदाराचं दोन महिन्यापेक्षा अधिक काळ निलंबन करता येत नाही. पण तरीही या सरकारने आमच्या आमदारांचं निलंबन केलं. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पद्धत बदलली. घटनेत गुप्त पद्धतीने मतदान करण्यास सांगितलेलं असताना ही पद्धत बदलली. हे घटनाबाह्य आहे, असं ते म्हणाले.
Read also:
- ‘मायकल लोबो कचरा घेऊन काँग्रेसमध्ये गेलेत, त्यांच्या हाती फक्त राखच येणार’
- आयोगाला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची जबाबदारी घ्यायला लावा अन्यथा गंभीर परिणाम; पडळकरांचा सरकारला इशारा
- पहिले तुम्ही छत्रपती संभाजी महाराज विमानतळाचा प्रस्ताव मंजूर करा; उद्धव ठाकरेंचा भाजपाला चिमटा
- ‘लोबो यांना आम्ही मंत्री केले मात्र मंत्रिपदाचा योग्य वापर ते विकासासाठी करू शकले नाहीत’
- राज्यातील महाविद्यालये १ फेब्रुवारीपासून उघडणार; मंत्री उदय सामंत यांची माहिती