सोलापुर : महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण चांगलंच चिघळलं आहे. महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा संघर्ष सध्या राज्यात बघायला मिळत आहे. अशातच आता महाराष्ट्रा काॅंग्रेसच्या कार्याध्यक्ष प्रणीती शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराजांवर टीका करताना महाराजांची जागा राजकारणात नाही तर मठात असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आता पेटण्याची शक्यता आहे.
फडणवींसाना आरोपी म्हणून नोटीस पाठवली नाही; दंगा करण्याची काय गरज दिलीप वळसे पाटील
प्रणीती शिंदे यांनी काल शेतकऱ्यांसमोर भाषण केलं. त्या भाषणात त्यांनी म्हटलं की, उत्तर प्रदेशची निवडणुक जवळ आल्यानंतर शेतकरी कायदे रद्द केले. एक वर्ष तुम्ही वाट पाहिलीय. याच दरम्यान जवळपास 700 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे तुम्ही बळी घेतले आणि त्यानंतर तुम्ही कायदे मागे घेतले. याबद्दल तुम्हांला लाज वाटायला पाहिजे असंही प्रणीती शिंदे म्हणाल्या.
राज्यांत पोलीस बदल्यांचा महाघोटाळा! घोटाळा दाबण्याचा सरकारचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीस
तसेच योगी आदित्यनाथ यांच्यावर त्यांनी शेलक्या शब्दांत टीका केली. योगी,महाराज यांच्याबद्दल आहे आम्हाला मान परंतु त्यांचं स्थान आहे, मंदिरामध्ये मठात राजकारणात नाही. ज्या दिवशी देशाच्या राजकारणात योगी आणि महाराज येतात त्या दिवशी देशाचं वाटोळं सुरू होतं. शिंदे यांचे वाक्य ऐकुन उपस्थित शेतकऱ्यांनी कडाडून टाळ्य़ा वाजवल्या.
राज्यांत पोलीस बदल्यांचा महाघोटाळा! घोटाळा दाबण्याचा सरकारचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीस
दरम्यान, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे दणदणीत विजय मिळवला आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड,मणिपुर आणि गोव्यात भाजपने सत्ता राखली आहे. तर पंजाबमध्ये काॅंग्रेसच्या हातून ती आता अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीच्या हातात हाली आली आहे.
Read also:
- नोटीस आम्हालाही येतात परंतु आम्ही तमाशा केला नाही! संजय राऊतांचा भाजपला खोचक टोला
- ” सत्य बाहेर आण्यासाठी सरकारी वकील प्रवीण चव्हाणांची नार्को टेस्ट करा”; विखे पाटलांची सरकारला मागणी
- “मुख्यमंत्री महोदय, तिचा पूजा चव्हाण होऊ देऊ नका “; रघुनाथ कुचिकवर कारवाईसाठी चित्रा वाघ यांची आर्त हाक
- देवेंद्र फडणवीस काय कायद्यापेक्षा मोठे आहेत काय संजय राऊतांची फडणवीसांवर सडकून टीका
- ” अन अजित पवारांनी भाषण थांबवलं..” ; अजित दादांच्या सर्वधर्म समभावाची अख्या पुण्यात चर्चा