मुंबई : मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात बऱ्याच खळबळजनक घटना घडल्या. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, युवानेते राहुल कनाल यांच्या घरांवर केंद्रीय यंत्रणांमार्फत छापेमारी करण्यात आली होती.
फडणवीसांना पोलीस ठाण्यात येण्याची आवश्यकता नाही; घरीच चौकशी करणार : मुंबई पोलीस
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राइव्ह बॉम्ब फोडत महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आणि थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारचे जनक शरद पवार यांच्यावर बाण सोडला. फडणवीसांना घेरण्यासाठी म संयमी नेतृत्व असणाऱ्या गृहमंत्री वळसे पाटलांनी उत्तर देण्याचे ठरवले.
महाविकास आघाडी सरकार पडणार नाही, जोपर्यंत..; रामदास आठवले यांचं खळबळजनक वक्तव्य
त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना पोलीस प्रशासनाकडून चौकशीसाठी बोलविण्यात आले आणि भाजपने थेट महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा दिला. फडणवीसांच्या सोबत भाजप ताकदीने उभा असल्याने सरकारने फडणवीसांची चौकशी राहत्या घरूनच करू असं म्हटलं.
भिंतीवरच्या घड्याळ्यानेच काढला काटा! फडणवीसांच्या आरोपांवर वकिल प्रवीण चव्हाणांचा खुलासा
यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. आम्हालाही केंद्रीय यंत्रणांकडून वारंवार नोटीसा धाडण्यात आल्या मात्र आम्ही कधी इतका अकांड तांडव केला नाही. काही लोक व काही राजकीय पक्ष स्वता:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत? असा सवालही राऊतांनी फडणवीसांना केला आहे.
Read also:
- ” अन अजित पवारांनी भाषण थांबवलं..” ; अजित दादांच्या सर्वधर्म समभावाची अख्या पुण्यात चर्चा
- फडणवींसाना आरोपी म्हणून नोटीस पाठवली नाही; दंगा करण्याची काय गरज दिलीप वळसे पाटील
- राज्यांत पोलीस बदल्यांचा महाघोटाळा! घोटाळा दाबण्याचा सरकारचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीस
- उद्या प्रत्येक जिल्ह्यात नोटिशीची होळी करणार: प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा
- आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत मलिकांचा राजीनामा नाहीच! जयंत पाटलांनी आता स्पष्टच केलं