ठाणे : राज्यात ईडीकडून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यावर होत असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी, आज प्रसार माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. ‘केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात, आमचा बळी जात आहे. हे मी अगदी आधीपासून माध्यमांत मांडत आलो आहे. मग मी असो की आणखी कुणी? विरोधक त्यांचे काम करतात,’ असा घरचा आहेर त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.
पटोलेंचा पवारांना टोला, म्हणाले “काँग्रेसनं जमीनी राखायला दिल्या अन् त्यांनी…”
तसेच, ‘मी किरीट सोमय्या यांच्यावर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. ते माझ्याबद्दल चुकीचा संदेश सगळीकडे पसरवत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मी दावा केला आहे. माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. ते जो काही निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल,’ असं म्हणत, ‘आम्ही राजकारण करताना पक्षांना अंगावर घेतो. पण कुटुंबीयांना त्यात आणत नाही. मात्र कुटुंबीयांनाही यात ओढलं जात आहे, याचा त्रास होतो,’ असे ते म्हणाले.
‘आव गोयंचो सायबा, मी पुन्हा येईन’, राष्ट्रवादीचा व्यंगचित्रातून फडणवीसांवर निशाणा
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, ‘इको फ्रेंडली मूर्तीच्या माध्यमातून पर्यावरण पूरक गणेश असा उत्सव आम्ही सगळे कुटुंब मिळून साजरा करतो. गणरायाकडे एकच मागणे आहे जगातून, राज्यातून आणि शहरांतून लवकरात लवकर हा रोग नाहीसा होवो,’ असं सांगत, ‘मंदिरे उघडावी ही जशी सर्वसामान्यांची इच्छा आहे, तशीच ती मुख्यमंत्र्यांचीही आहे. पण संकटात तिसऱ्या लाटेला निमंत्रण नको,’ असं मत त्यांनी व्यक्त केलं.
Read Also :
- …तरच महाविकास आघाडीला निवडणुकांमध्ये यश मिळेल; अजित पवारांच महत्त्वपुर्ण विधान
- …त्यामुळे अण्णा पुन्हा उपोषणाला बसणार, दिला महाविकास आघाडीला सरकाला इशारा
- राजीव सातवांच्या पत्नी प्रज्ञा यांना राज्येसभेवर संधी की विधानसभेची उमेदवारी? तर्कवितर्कांना उधान
- ‘दंडुकेशाहीच्या जोरावर हे सरकार माध्यमांवर दबाव निर्माण करतंय,’ फडणवीसांचा आरोप
- पत्रकारांवर दादागिरी करणाऱ्या इन्स्पेक्टर संजय निकम यांच्यावर तात्काळ कारवाई करा – गुणरत्न सदावर्ते