अहमदनगर : महाविकास आघाडी सरकारमधल्या एकेका मंत्र्यांचे घोटाळे आणि गैरप्रकरणे आता भाजपकडून बाहेर काढली जात असताना, अण्णा हजारेंनी ठाकरे सरकारला इशारा देत टेन्शन वाढवले आहे. ‘हे सरकार फक्त पडण्यासाठी घाबरत आहे, हे सरकार मोर्चे-आंदोलनाला घाबरत नाही. त्यामुळे आता जनतेच्या हितासाठी आणि हे राज्य भ्रष्टाचार मुक्त व्हावा यासाठी, राज्यात लोकायुक्त कायदा लागू करावा,’ ही मागणी करत त्यांनी, आंदोलनाचा इशारा दिला आहे.
‘हे’ दोन बडे नेते करत आहेत भाजप-शिवसेनेतले अंतर कमी? चर्चांना उधाण
‘जनतेकडे सर्वाधिकार असलेला, लोकपाल व लोकायुक्त कायदा हा भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यांनतरचा तयार झालेला खूप प्रभावी व सक्षम असा कायदा आहे. या कायद्याने, जनतेने मुख्यमंत्री, आमदार, अधिकारी यांच्याविरोधात सक्षम पुरावे लोकायुक्ताकडे दिले, तर त्यांची चौकशी करण्याचा अधिकार या कायद्याने त्यांना दिला आहे. हा कायदा इतका प्रभावी व सक्षम कायदा आहे. पण सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे,’ असा आरोप त्यांनी केला आहे.
‘दंडुकेशाहीच्या जोरावर हे सरकार माध्यमांवर दबाव निर्माण करतंय,’ फडणवीसांचा आरोप
‘हा कायदा लागू करण्यात यावा, यासाठी आम्ही २०११ पासून आंदोलन करत आलो आहोत. भाजप सरकारच्या काळात देखील आंदोलन करण्यात आले आहे. आम्ही या सरकारला देखील लोकपाल व लोकायुक्त कायदा आणण्यासाठी मागणी केली. त्यासाठी या सरकारला ३ महिन्याचा कालावधी दिला. पण हे सरकार कायदा लागू करत नसल्याने आता जानेवारी महिन्यात हा कायदा लागू करण्यासाठी राज्य सरकार विरोधात उपोषणाचा इशारा दिला आहे.
आधी डरकाळी फोडली, आता नरमाईचा सूर? राणे तीनच दिवसांत पलटले
तसेच, ‘हे महाविकास आघाडी सरकार पडायला घाबरतं. त्यामुळे आम्ही ठरवलं आहे. राज्याच्या आणि जनतेच्या हितासाठी राज्यात मोठं आंदोलन करायचं. त्यासाठी आम्ही आत्तापासून कार्यकर्त्यांना कळवलं आहे. त्यांना सांगितलं आहे. आंदोलनाच्या तयारीला लागा. आता सप्टेंबर महिना सुरु आहे, आम्ही एक नोटीस या सरकारला देणार आहोत, त्यानंतर एकाच वेळेला राज्यव्यापी मोठं आंदोलन करू,’ असं त्यांनी यावेळी सांगितलं.
Read Also :
- राजीव सातवांच्या पत्नी प्रज्ञा यांना राज्येसभेवर संधी की विधानसभेची उमेदवारी? तर्कवितर्कांना उधान
- पत्रकारांवर दादागिरी करणाऱ्या इन्स्पेक्टर संजय निकम यांच्यावर तात्काळ कारवाई करा – गुणरत्न सदावर्ते
- ‘आव गोयंचो सायबा, मी पुन्हा येईन’, राष्ट्रवादीचा व्यंगचित्रातून फडणवीसांवर निशाणा
- पटोलेंचा पवारांना टोला, म्हणाले “काँग्रेसनं जमीनी राखायला दिल्या अन् त्यांनी…”
- शरद पवारांनी केलेलं करेक्ट वर्णन काँग्रेसवर चपखल लागू होतंय; फडणवीसांचा परफेक्ट निशाणा