मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार आणि केंद्रातील ईडी यंत्रणेचा ससेमिरा लागला आहे. महाविकास आघाडीतील विद्यमान मंत्री, आमदार, खासदार, त्यांचे निकटवर्तीय अशा सर्वांवरच ईडीकडून छापेमारी, चौकश्या सुरु आहे. मागील दोन आठवड्यांमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीने कारवाईचा बडगा उगारला होता. यावरून संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि ईडीवर जोरदार टीका केली होती. आता संजय राऊत यांनी ‘सत्यमेव जयते’ म्हणून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना एक पत्र लिहले आहे.
शिवाजी पार्क हे शिवाजी पार्क राहू द्या, त्याची स्मशानभूमी करू नका – प्रकाश आंबेडकर
या पत्रात संजय राऊत यांनी खळबळ उडवून देणारे दावे केले आहेत. सरकार पाडण्यासाठी आलेली ऑफर नाकारल्याने ईडी मार्फत कुटुंबीय आणि निकटवर्तीयांवर कारवाई सुरू झाली असल्याचे संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीत आधीच मारामारी; त्यात कशी निभावेल भाजपातील नाराजांची शिरजोरी?
इडीसहित अन्य काही सरकारी यंत्रणा आणि तपास यंत्रणांचे अधिकारी आपल्या राजकीय नेत्यांच्या हातातील कळसूत्री बाहुले झाले आहे. सरकार पाडण्यासाठी मी महत्त्वाची भूमिका पार पाडावी जेणेकरून मध्यावधी निवडणूका पार पाडल्या जातील अशी ऑफर मला देण्यात आली होती.
आपल्या विचारांतून आपले संस्कार आणि संस्कृती दिसते; रुपाली चाकणकरांचा अमृता फडणवीसांना टोला
मात्र, मी याला नकार दिला. राज्यात मध्यावधी निवडणूक करण्यास मदत करण्यास नाकारले तर मला तुरुंगात डांबण्याची धमकी देण्यात आली.मी दिलेल्या या नकाराची मोठी किंमत चुकवावी लागेल अशी धमकी देखील देण्यात आली होती, असेही संजय राऊत यांनी त्या पत्रात म्हटलं आहे. संजय राऊत यांनी लिहलेल्या पत्रामुळे आता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत संघर्ष होण्याची शक्यता आहे. मागे आमदार प्रताप सरनाईक आणि संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांची चौकशी करण्यात आली आहे.
Read also:
- धनंजय महाडिक, पुत्र विश्वजीत महाडिक पुन्हा सक्रिय; आगामी काळात मोहोळ तालुक्यात एकहाती सत्तेसाठी उतरले मैदानात
- २०२४ला औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरेच होणार; रावसाहेब दानवेंना धक्का देत सत्तरांची सोयगावात जोरदार बॅटिंग
- पुण्यात प्रभावरचनेवरून राष्ट्रवादीत चलबिचल; प्रमुखांनी आमचा विचारच केला नसल्याची दबक्या आवाजात चर्चा
- म्हापशात काँग्रेसचा ‘रात्रीस खेळ चाले’; स्वाभिमानी मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न ?
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; उद्यापासून मिळणार ऑनलाईन हॉलतिकीट