पुणे : आगामी २०२४ च्या लोकसभेची निवडणुक पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून लढवणार असल्याची चर्चा सध्या सुरूय. मोदींनी पुण्यातून निवडणुक लढविल्यास याचा फायदा महाराष्ट्राला होऊ शकतो. अन् राज्यातील ४८ पैकी ४८ जाग निवडून येऊ शकतात. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.
हेही वाचा…२०२४ लोकसभेची निवडणुक नरेंद्र मोदी पुण्यातून लढणार, काॅंग्रेसचा ‘हा’ बडा नेता मोदीविरूद्ध लढणार, राज्यात एकच चर्चा
देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पहिल्यापासूनचा मतदारसंघ हा गुजरातमधला आहे. तरी देखील ते मागच्या निवडणुकीत वाराणसीमधून निवडून आलेत. सुरूवातीला नरेंद्र मोदी दोन्हीही मतदारसंघातून निवडून आले आहेत. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असून त्यांच्या नावावर ३०० पेक्षा अधिक जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी कुठे उभं राहावं. परंतु वाचलेल्या बातमीसमोर प्रश्न चिन्ह होता. त्यामुळे त्यांचा तो अधिकार असून तो ते घेतील. असं अजित पवारांनी सांगितलं.
हेही वाचा…एक देश, एक निवडणुक..! मोदी सरकारचा विरोधकांना दे धक्का, रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातून निवडणुकीच्या रिगंणात आहेत. मोदी हे आगामी लोकसभा निवडणूक पुण्यातून लढणार असल्याचा दावा उच्चपदस्थ नेत्यांकडून करण्यात आला आहे. मोदी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गुजरात आणि उत्तरप्रदेश या दोन्हीही राज्यातून लोकसभेवर निवडून गेले होते. त्याचप्रमाणे मोदी यावेळी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांनी मोदी यांच्याबाबत पुण्यातून निवडणूक लढविण्याबाबत चाचपणीही केली आहे. मोदी हे पुण्यातून लोकसभेवर निवडून गेले आणि भाजपची केंद्रात सत्ता आली तर महाराष्ट्राला मोदींच्या रुपाने पहिला पंतप्रधान मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय महाराष्ट्रात भाजपला फायदा होईल, अशीही अटकळ केली जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीचा खर्च कुणी केला? त्याचा हिशोब कोण देणार ?” सुषमा अंधारेंचा सवाल
हेही वाचा…‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयकाला महाविकास आघाडीचा विरोध, तर अजित पवार गटाने मांडली आपली भूमिका
हेही वाचा…धक्कादायक…! भाजपच्या ‘या’ केंद्रीय मंत्र्यांच्या घरात तरूणांची हत्या, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…“निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यावर संस्कार नावाचं व्हिटॅमिन कमी पडलं”, सुषमा अंधारेंची जहरी टिका
हेही वाचा…इंडिया आघाडीच्या लोगाचं अनावरण पुढं ढकललं, कारण आलं समोर, तर भाजपची जोरदार टिका