मुंबई : विरोधकांची तिसरी बैठक मुंबईत होत असून या बैठकीचा सत्ताधारी भाजपने धसका घेतला आहे. एकीकडे इंडियाची बैठका होत असतांन दुसरीकडे सत्ताधारी भाजप देशात एक देश एक निवडूण आणण्याची रणनीती आखत आहेत. यासाठी आता माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती देखील स्थापन केली असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“इंडिया दिवसेंदिवस मजबुत होतेय, येणाऱ्या काळात अनेक साक्षात्कार होतील”
येत्या १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात मोदी सरकार संसदेत एक देश एक निवडणुक विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. लोकसभेत मोदी सरकारला पुर्ण बहुमत आहे. परंतु राज्यसभेत भाजपला बहुमत नसल्याने याठिकाणी मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे आता आगामी काही दिवसात काय राजकीय हालचाली होणार ते पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…राहुल गांधींचा मुंबईत अदानींवरून मोदींवर हल्लाबोल, भ्रष्टाचाराचा आरोप करत साधला निशाणा
यातच आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आहे. त्यामुळे नेमकं काय होणार ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, मोदी सरकार आणत असलेल्या विधेयकाला विरोधी पक्षांकडून जोरदार विरोध केला जाण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी याविरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत विरोधक असल्याची माहिती समोर येत आहे. याचा विरोध म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील याचा प्रंचड विरोध केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“फडणवीसांची दुकानदारी बंद होण्याची वेळ आलीय, फडणवीसांनी भाजपाला अडचणीत आणलंय,”
हेही वाचा…इंडिया आघाडीच्या नाकावर टिचून महायुतीचीही मुंबईत बैठक, दोन महत्वाचे ठराव मंजूर
हेही वाचा…“पराभाव दिसल्यानं भाजपकडून पर्यांयाचा वापर”, केंद्र सरकारच्या त्या विधेयकावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल
हेही वाचा…“अनेक चेहरे कोणाला असतात, तिकडे रावण अन् इकडे..,”मुख्यमंत्र्यांचं ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…मोदींनी विरोधकांवर मोठा डाव टाकला, संसदेच्या विशेष अधिवेशनात विरोधकांना जबरदस्त धक्का देण्याच्या तयारीत