मुंबई : विरोधकांची मुंबईत बैठक होत असतांना दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारने मोठी रणनीति आखली आहे. येत्या १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान केंद्र सरकारने पाच दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवलं आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार एक देश एक निवडणूक हे विधेयक आणणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…८३ वर्षाचा योद्धा मैदानात, शरद पवारांनी आखली परराज्यातही मोठी रणनीती
केंद्र सरकार जे विधेयक आणण्याचा विचार करीत आहेत. तो फक्त राहुल गांधींनी अदाणींच्या मुद्यावर लक्ष भटकवण्यासाठी भाजपने प्रयत्न केला आहे. विरोधकांची आता बैठक होत असून सत्ताधारी पक्ष वेगवेगळे प्रयत्न करीत आहेत. कोणताही कायदा आणणं हे सरकारचं काम आहे. परंतु ते करत असतांना विरोधी पक्षाला विश्वासात घेणंही तितकच महत्वाचं आहे. कारण या बैठकीसाठी ११ राज्याचे मुख्यमंत्री असून ६ मुख्यमंत्र्यांनी तटस्थेची भूमिका घेतलीय. अशा स्थितीत संसदेत कायदा बनवण्यासाठी बहुमत लागतं, ते आहे का ? त्यामुळे हे सर्व प्रश्न उपस्थितीत होतात. असं विजय वडेट्टीवारांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…“विकासाच्या नावाखाली केंद्राची वक्र नजर राजधानी मुंबईवर वळली”, राष्ट्रवादीची भाजपवर जहरी टिका
दरम्यान, सरकार कोणताही कायदा संसदेत आणेल. त्याला आमचा आक्षेप असण्याचं कोणंतही कारण नाही. परंतु हे सर्व धुळफेक आहे. यात काहीही होणार नाही. असं यातून दिसत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अनेक चेहरे कोणाला असतात, तिकडे रावण अन् इकडे..,”मुख्यमंत्र्यांचं ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…मोदींनी विरोधकांवर मोठा डाव टाकला, संसदेच्या विशेष अधिवेशनात विरोधकांना जबरदस्त धक्का देण्याच्या तयारीत
हेही वाचा…“इंडिया दिवसेंदिवस मजबुत होतेय, येणाऱ्या काळात अनेक साक्षात्कार होतील”
हेही वाचा…राहुल गांधींचा मुंबईत अदानींवरून मोदींवर हल्लाबोल, भ्रष्टाचाराचा आरोप करत साधला निशाणा
हेही वाचा…“मुंबईतून पळून गेलेल्यांनी इतरांचा खर्च काढू नये”, वडेट्टीवारांचा उदय सामांतांवर जोरदार पलटवार