पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीची सध्या राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी 2024 लोकसभा निवडणुक पुण्यातून लढणार असल्याची माहिती पुढारीने दिलीय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता एकच खळबळ उडाली आहे. मोदी पुण्यातून निवडणुक लढवणार असणार तर त्यांच्या विरोधात काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उभे राहणार असल्याचं पटोलेंनीच सांगितलंय.
हेही वाचा…मोदींनी विरोधकांवर मोठा डाव टाकला, संसदेच्या विशेष अधिवेशनात विरोधकांना जबरदस्त धक्का देण्याच्या तयारीत
नरेंद्र मोदी पुण्यातून लढणार असल्याची अधिकृत माहिती पक्षाकडून अद्याप देण्यात आली नाहीय. परंतु मोदींनी पुण्यातून निवडणुक लढवली तर त्यांना जिंकून आणण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू. त्यांना निवडून आणण्यासाठी आमचं भाग्यचं समजू. परंतु यातून महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी ४८ जागा भाजप जिंकू शकते. असा विश्वास भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा…“इंडिया दिवसेंदिवस मजबुत होतेय, येणाऱ्या काळात अनेक साक्षात्कार होतील”
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी पुण्यातून निवडणूक लढवली तर पुण्यात तसेच महाराष्ट्रात त्यांच्या पाच ते सहा सभा देखील होतील. त्यांचा पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि पुण्यातील आजुबाजूच्या भागात देखील याचा मोठा परिणाम होईल. उत्तरप्रदेशनंतर सर्वात जास्त जागा महाराष्ट्रात असून याचा नक्कीच मोठा फायदा होण्याची शक्यात आहे. ज्या पद्धतीने मोदींनी सुरूवातीला गुजरात त्यानंतर उत्तर प्रदेशमधून निवडणुक लढवली होती. अन् त्यात ते विजयी झाले होते. त्याचपद्धतीने पुण्यात याचा मोठा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. असंही त्यांनी सांगितलं.
मोदी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गुजरात आणि उत्तरप्रदेश या दोन्हीही राज्यातून लोकसभेवर निवडून गेले होते. त्याचप्रमाणे मोदी यावेळी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांनी मोदी यांच्याबाबत पुण्यातून निवडणूक लढविण्याबाबत चाचपणीही केली आहे मोदी हे पुण्यातून लोकसभेवर निवडून गेले आणि भाजपची केंद्रात सत्ता आली तर महाराष्ट्राला मोदींच्या रुपाने पहिला पंतप्रधान मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय महाराष्ट्रात भाजपला फायदा होईल, अशीही अटकळ
READ ALSO :
हेही वाचा…एक देश, एक निवडणुक..! मोदी सरकारचा विरोधकांना दे धक्का, रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती
हेही वाचा…“फडणवीसांची दुकानदारी बंद होण्याची वेळ आलीय, फडणवीसांनी भाजपाला अडचणीत आणलंय,”
हेही वाचा…इंडिया आघाडीच्या नाकावर टिचून महायुतीचीही मुंबईत बैठक, दोन महत्वाचे ठराव मंजूर
हेही वाचा…“पराभाव दिसल्यानं भाजपकडून पर्यांयाचा वापर”, केंद्र सरकारच्या त्या विधेयकावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल
हेही वाचा…“अनेक चेहरे कोणाला असतात, तिकडे रावण अन् इकडे..,”मुख्यमंत्र्यांचं ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर