रायगड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंचे १९ बंगले शोधण्यासाठी आज भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या रायगडमधील कोर्लई गावात गेले होते. तिथं गेल्यावर सोमय्यांनी ग्रामपंचायतीत भेट दिली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
हिंदुस्थानी भाऊ’ला अखेर सशर्त जामीन मंजूर, काय आहे नेमकं प्रकरणं… वाचा सविस्तर…
किरीट सोमय्या 15 ते 20 मिनीटे कोर्लई ग्रामपंचायतमध्ये थांबले होते. यावेळी त्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी एक पत्र दिलं असल्याचं सोमर आलं आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी संपल्यानंतर तसेच किरीट सोमय्या ग्रामपंचायतमधून निघून गेल्यानंतर शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं.
अब्रु नुकसानीच्या दाव्यांच्या हेलपाट्यांनीच तुम्ही मरणार – चंद्रकांत पाटील
दरम्यान, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या निघून गेल्यानंतर ग्रापंचायतमध्ये गोमुत्र शिंपडलं. तसेच सरपंच प्रशांत मिसाळ यांनी सोमय्या कोणतेच कागदपत्रे घेऊन गेले नसल्याचं सांगितलं आहे. तर भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने – सामने येणार असल्याचं माहिती असल्याने कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून जोरदार पोलीसांचा बंदोबस्त करण्यात आला होता.
Read also:
- नारायण राणेंना मुंबई महापालिकेचा दणका; अनाधिकृत बांधकामप्रकरणी पालिकेची नोटीस
- टीका करतात आणि कोकणात येऊन पडतात; उदय सामंतांचा नाव न घेता राणेंवर प्रहार
- “विकासाच्या मुद्यावर राजकारण व्हावे, १५ वर्षे विरुद्ध ५ वर्षे असा सामना व्हावा”आमदार महेश लांडगे
- शिवसेनेवर शोककुळा: जेष्ठ नेते सुधीर जोशी यांचे निधन, वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास
- महाराष्ट्रातील काँग्रेस नेते तुमचं ऐकत नाहीत का? राजू शेट्टींच राहूल गांधींना पत्र