पनवेल : आत्तापर्यंत मुंबई गोवा महामार्गावर १५६६६ हजार कोटी रूपये पैसा खर्च झाला आहे. तरीही रस्ता झाला नाही. फक्त काहींच्या तुंबड्या भरल्या गेल्या. कोकणात अनेक शिवसेनेचे आमदार निवडून दिले आहेत. परंतु कोणीही या रस्त्यांचा पाठपुरावा करीत नाही. परंतु आता आपल्यालाच रस्त्यावर उतरावं लागेल. असे आंदोलन करा की दहशत असावी, असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला कडक इशारा दिला.
हेही वाचा…राज्यात मोठी राजकीय डाळ शिजतेयं? कोण कोणासोबत? तर कोण कोणाच्या विरोधात ?
कोकणातून जाणाऱ्या गोवा ते महाराष्ट्र रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पनवेलच्या सभेतून आंदोलनाचा इशारा दिला. त्यावेळी ते म्हणाले की, मुंबई गोवा महामार्गावर आजपर्यंत २५०० लोकं मृत्युमुखी पडलेत. अनेकांना दुखणी लागली आहेत, गाड्यांचं नुकसान झालं आहे. तरीही त्याच लोकांना निवडून देत आहेत, त्यामुळे हे पुन्हा पुन्हा निवडून येणारे निवांत आहेत. ते टेंडर, टक्केवारीत व्यस्त आहेत.
हेही वाचा…“सरकारमध्ये अस्वस्थता.., मुख्यमंत्र्यांने ठेवलं स्नेहभोजन, ‘या’ मंत्र्यांना दिलं आमंत्रण”
आत्तापर्यंत मुंबई गोवा महामार्गावर खर्च झालेला पैसा १५६६६ कोटी रुपये आहे. तरीही रस्ता झाला नाही. फक्त काहींच्या तुंबड्या भरल्या गेल्या. मी नितीनजींना विनंती केली होती की जर राज्य सरकारला जमत नसेल तर तुम्ही घ्या तर ते म्हणाले की अहो कॉन्ट्रॅक्टर पळून जातात. हे नेमकं मुंबई गोवा हायवेच्या बाबतीतच का घडलं? कोकणाचा विकास होऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करतंय का? असा सवालही त्यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…पुणे शहरात शरद पवार गटाच्या हालचाली सुरू, ‘मी शरद मित्र’ नावाखाली सदस्य नोंदणी
हेही वाचा…“इंडिया आघाडीत ३० पक्ष एकत्र आले, तरीही आम्हाला काही फरक पडत नाही”
हेही वाचा…शरद पवारांशिवाय निवडणुका लढवू ? उद्धव ठाकरेंकडून लोकसभा मतदारसंघाचा आढावा
हेही वाचा…मेधा कुलकर्णी अन् चंद्रकांत पाटलांमधील नाराजी देवेंद्र फडणवीस दूर करणार
हेही वाचा…“तर उद्या दाऊद इब्राहिम याने भाजपचे गुणगान गायले तर त्यालाही पक्षात घेईल”