ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर शिंदे गटात प्रंचड अस्वस्थता पसरली. महाविकास आघाडी सरकार काळात निधीवाटपावरून शिंदे गटाने शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारलं. परंतु महायुतीच्या सरकारमध्येही अजित पवारांना अर्थखातं दिल्यानंतर शिंदे गटात मोठ्या कुरबुजी सुरू झाल्या. यातच महायुतीत मागील काही दिवसापासून आलबेल नसल्याचं चित्र दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता महायुतीत सर्व काही आलबेल असल्याचं दाखवण्यासाठी स्नेहभाोजनाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…शरद पवारांच्या भेटीची तक्रार काॅंग्रेसच्या हायकमांडकडे, राहुल गांधी चर्चा शरद पवारांसोबत चर्चा करणार
शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीगाठी आणि महायुतीतील हालचाली यामुळे सरकारमध्ये अस्वस्थता दिसून आली आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक साताऱ्यात आपल्या मुळ गावी तब्बल चार दिवस सुट्टीवर गेल्याने राजकीय तर्कवितर्क काढू लागले आहेत. यातच शरद पवार-अजित पवार यांच्या भेटीगाठी अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपद यामुळे सरकारमध्ये खुप मोठ्या हालचाली सुरू झाल्याचं दिसून येत आहे.
हेही वाचा…“अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाईल, असं मुळीच वाटत नाही”
दरम्यान, मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडीनंतर आता सरकारमध्ये सर्व ठिकठिक आहे, हे दाखवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मंत्रिमंडळातील सहकारी मंत्र्यांना स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिलं आहे. अजित पवार मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर पहिलेच स्नेहभोजन उद्या संध्याकाळी ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“वॉशिंग मशीनच्या विरोधात आपल्याला लढायचं, घाबरण्याचं नाही”, सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला
हेही वाचा…कॉंग्रेसमध्ये धुसफूस आजी माजी आमदारांना कोणी विचारेना, पटोलें विरोधात नाराजीचा सूर
हेही वाचा…“अरे वेड्या त्या गाडीत नव्हतोच, तर उतरणार कसा ?”, अजित पवारांनी ‘तो’ दावा फेटाळला
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा, शिंदेंनी ‘दोन’ उपमुख्यमंत्र्यांपासून सावध राहावं”
हेही वाचा…“पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांना दोन मोठ्या ऑफर,” काॅंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचा दावा