सातारा : मोदी सरकारमुळे देश आर्थिक संकटाकडे वाटचाल करतोय. संविधान वाचेल की नाही? हे सांगता येणार नाही. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी हे सरकार बदल्यांमध्ये भ्रष्टाचार करत आहे. एकनाथ शिंदे हे फक्त नावापुरते मुख्यमंत्री असून देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या हातातील बाहुले आहे. अशी टिका राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
हेही वाचा…“एकीकडे एकनिष्ठ आणि दुसरीकडे भ्रष्टाचारी लोक”, आदित्य ठाकरेंची जहरी टिका
पुढे बोलतांना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भाजप जाती-जातीमध्ये द्वेष निर्माण करून दंगली घडवितो. या देशात पुन्हा भाजपचे सरकार आले तर मोदी लोकशाही जिवंत ठेवणार नाहीत. भाजपला मतदान करून देशाचे आणि स्वत:चे नुकसान करून घेऊ नका. असा सल्ला देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.
हेही वाचा…“युडीसीपीआर कायद्यात शिथिलता आणि शनिवारवाडा परिसरातील बांधकामांना परवानगी द्या,” हेमंत रासनेंची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
दरम्यान, माझ्या माहितीनुसार, शरद पवारांना केंद्रात कृषी खाते आणि निती आयोगाचे चेअरमनपद अशा २ ऑफर अजितदादांसोबतच्या बैठकीत देण्यात आल्या होत्या.परंतु शरद पवारांनी या दोन्ही ऑफर नाकारल्या असं त्यांनी सांगितले. अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यापासून आतापर्यंत ३ ते ४ वेळा या दोन्ही नेत्यांची बैठक झाली. शरद पवारांना एनडीएकडे वळवावे अशी यामागची भाजपाची रणनीती असल्याचे दिसून येते. असंही त्यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांच्या भेटीची तक्रार काॅंग्रेसच्या हायकमांडकडे, राहुल गांधी चर्चा शरद पवारांसोबत चर्चा करणार
हेही वाचा…“अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाईल, असं मुळीच वाटत नाही”
हेही वाचा…“भाजपकडून आपल्याला ऑफर,परंतु..,” मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मोठं विधान
हेही वाचा…“नवाब मलिकांच्या बेलमध्ये आणखी वाढ होतांना दिसेल,” सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
हेही वाचा…“संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्याची भाजपची रणनिती”, दोन पवारांच्या भेटीवर रोहित पवारांची भाजपवर टिका