पुणे : मनी लॉंड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांच्यावर दोन वर्षापुर्वी ईडीने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांना इडीने अटक केली व त्यानंतर त्यांना तुरूंगात डांबण्यात आलं. याकाळात जामीन अर्जासाठी नवाब मलिक यांनी वारंवार अर्ज दाखल केलेत. परंतु सातत्याने ईडीने त्यावर आक्षेप घेतला. यातच आता त्यांना दोन महिन्यासाठी वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
हेही वाचा…स्वच्छतेचा नमो करंडक स्पर्धेचा न्यूयॉर्कमध्ये डंका; टाइम्स स्क्वेअर बिल बोर्डवर झळकला 3 पर्वाच्या स्पर्धेचा लोगो
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. अनेक कार्यकर्त्यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात दाखल झालेत. यातच आता नवाब मलिक तुरूंगातून बाहेर आल्यानंतर कोणत्या गटात जाणार त्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर नवाब मलिक ईडी कोठडीतून बाहेर आले आहेत. ते कोणत्या पवारांकडे जातील? ते मी सांगू शकत नाही. नवाब मलिक बाहेर आले, ही चांगली गोष्ट आहे. त्यांना इतके दिवस तुरूंगात का ठेवलं होतं? हेच मला कळत नाही आणि आता बाहेर येण्यासाठी नेमकी काय जादू झाली? हेही समजत नाही. असं काॅंग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी म्हटले आहे. तसेच अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाईल, असं मला मुळीच वाटत नाही. असंही त्यांनी सांगितले.
हेही वाचा…जामीन मंजूर, पण… कोर्टाकडून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना ६ अटी
दरम्यान, नवाब मलिक यांच्यासह याआधी अनिल देशमुख, संजय राऊत यांच्यावर खोट्या केसेस दाखल झाल्या आहेत. परंतु कोर्टाच्या माध्यमातून नवाब मलिक यांना न्याय मिळालेला आहे. अनिल देशमुख ज्यावेळी तुरूंगातून बाहेर आले होते. तेव्हाही त्यांना भेटण्यासाठी गेले होते आणि आज दोन महिन्यासाठी का होईना, परंतु नवाब मलिक बाहेर येताहेत. कोर्टाने बेल दिली आहे. त्यात आणखी वाढ होतांना आपल्याला दिसणार आहे. अस खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“भाजपकडून आपल्याला ऑफर,परंतु..,” मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मोठं विधान
हेही वाचा…“नवाब मलिकांच्या बेलमध्ये आणखी वाढ होतांना दिसेल,” सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
हेही वाचा…“संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्याची भाजपची रणनिती”, दोन पवारांच्या भेटीवर रोहित पवारांची भाजपवर टिका
हेही वाचा…“एकीकडे एकनिष्ठ आणि दुसरीकडे भ्रष्टाचारी लोक”, आदित्य ठाकरेंची जहरी टिका
हेही वाचा…“युडीसीपीआर कायद्यात शिथिलता आणि शनिवारवाडा परिसरातील बांधकामांना परवानगी द्या,” हेमंत रासनेंची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी