पुणे : नवाब मलिक यांच्यासह याआधी अनिल देशमुख, संजय राऊत यांच्यावर खोट्या केसेस दाखल झाल्या आहेत. परंतु कोर्टाच्या माध्यमातून नवाब मलिक यांना न्याय मिळालेला आहे. अनिल देशमुख ज्यावेळी तुरूंगातून बाहेर आले होते. तेव्हाही त्यांना भेटण्यासाठी गेले होते आणि आज दोन महिन्यासाठी का होईना, परंतु नवाब मलिक बाहेर येताहेत. कोर्टाने बेल दिली आहे. त्यात आणखी वाढ होतांना आपल्याला दिसणार आहे. अस खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“ती कृती भीष्म पितामहाकडून होता कामा नये,” ठाकरे गटाकडून शरद पवारांवर पहिल्यांदाच टिका
मनी लॉंड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांच्यावर दोन वर्षापुर्वी ईडीने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांना इडीने अटक केली व त्यानंतर त्यांना तुरूंगात डांबण्यात आलं. याकाळात जामीन अर्जासाठी नवाब मलिक यांनी वारंवार अर्ज दाखल केलेत. परंतु सातत्याने ईडीने त्यावर आक्षेप घेतला. यातच आता त्यांना दोन महिन्यासाठी वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला आहे.
हेही वाचा…“जयंत पाटलांना ईडीचा धाक दाखवून सोबत घेण्याचा भाजपचा प्रयत्न,” शरद पवारांचा गंभीर आरोप
दरम्यान, नवाब मलिकांना ५० हजार रूपयांचा जामीन द्यावा लागणार आहे. तसेच याप्रकरणातील कोणत्याही साक्षीदाराला धमकावू नये, अशी अट कोर्टाकडून घालण्यात आली आहे. त्याचबरोबर नवाब मलिकांना आपल्या घराचा पत्ता तसेच मोबाईल नंबर द्यावा लागणार आहे. तसेच परदेशात जाण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली असून त्यांना पासपोर्ट देखील जमा करावा लागणार आहे. तसेच मीडीयाशी बोलू नये, गुन्हेगारी कृत्यात भाग घेऊ नये. अशा अटी ही घालण्यात आल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्याची भाजपची रणनिती”, दोन पवारांच्या भेटीवर रोहित पवारांची भाजपवर टिका
हेही वाचा…“एकीकडे एकनिष्ठ आणि दुसरीकडे भ्रष्टाचारी लोक”, आदित्य ठाकरेंची जहरी टिका
हेही वाचा…“युडीसीपीआर कायद्यात शिथिलता आणि शनिवारवाडा परिसरातील बांधकामांना परवानगी द्या,” हेमंत रासनेंची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
हेही वाचा…स्वच्छतेचा नमो करंडक स्पर्धेचा न्यूयॉर्कमध्ये डंका; टाइम्स स्क्वेअर बिल बोर्डवर झळकला 3 पर्वाच्या स्पर्धेचा लोगो
हेही वाचा…जामीन मंजूर, पण… कोर्टाकडून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना ६ अटी