पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची गुप्त बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. त्यानंतर आता राज्यातील राजकीय नेत्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर शरद पवारांनी या सर्व प्रकरणावर कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दुर करावा, अशी भूमिका महाविकास आघाडीतील नेत्यांनी घेतली आहे. यातच आता काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“युडीसीपीआर कायद्यात शिथिलता आणि शनिवारवाडा परिसरातील बांधकामांना परवानगी द्या,” हेमंत रासनेंची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
अशा भेटीमुळे जनतेत संभ्रम निर्माण होत आहे. त्यांचे नातेवाईक आहेत तर घरी भेट घेता येते, पण गाडीत झोपून जाणे आणि गुप्तपणे बैठक घेणे कशासाठी ? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीत यावर चर्चा करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्याबरोबरही चर्चा झाली असून त्यांना याबाबत माहिती दिलीय. काॅंग्रेस हायकमांडदेखील यावर लक्ष ठेवून आहे. मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत याबाबत त्यांच्याबरोबर चर्चा केली जाईल. असंही त्यांनी म्हटलयं.
हेही वाचा…स्वच्छतेचा नमो करंडक स्पर्धेचा न्यूयॉर्कमध्ये डंका; टाइम्स स्क्वेअर बिल बोर्डवर झळकला 3 पर्वाच्या स्पर्धेचा लोगो
दरम्यान, तुम्ही नातीगोती जपायची आणि कार्यकर्त्यांनी मारामारी करायची का ? आमचेही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याशी संबंध आहेत. मग आम्हीही त्यांच्यासोबत चहा पित बसलो तर चालेल का ? हे आमच्या डीएनएत नाही, असं सांगतानाच ती कृती भीष्म पितामहाकडून होता कामा नये, असा थेट इशाराच संजय राऊतांनी शरद पवार यांना दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाईल, असं मुळीच वाटत नाही”
हेही वाचा…“भाजपकडून आपल्याला ऑफर,परंतु..,” मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मोठं विधान
हेही वाचा…“नवाब मलिकांच्या बेलमध्ये आणखी वाढ होतांना दिसेल,” सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
हेही वाचा…“संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्याची भाजपची रणनिती”, दोन पवारांच्या भेटीवर रोहित पवारांची भाजपवर टिका
हेही वाचा…“एकीकडे एकनिष्ठ आणि दुसरीकडे भ्रष्टाचारी लोक”, आदित्य ठाकरेंची जहरी टिका