पुणे : केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भाजप विरोधात देशपातळीवर कॉंग्रेससह इतर विरोधकांनी एकजूट करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रामध्ये देखील सत्ताधाऱ्यांविरोधात महाविकास आघाडीच्या माध्यमातून जुळवणी केली जात आहे. दुसरीकडे पुणे शहरात मात्र कॉंग्रेसमध्ये उभी फुट पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. विद्यमान शहराध्यक्ष अरविंद शिंदे विरुद्ध आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, माजी शहराध्यक्ष रमेश बागवे यांचा वेगळा गट निर्माण झाल्याचे गेल्या काही काळापासून दिसून आले आहे. आत राज्य पातळीवरील नेत्यांच्या बैठकीतून अंतर्गत कलह चव्हाट्यावर येत आहे.
हेही वाचा…“भाजपकडून आपल्याला ऑफर,परंतु..,” मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मोठं विधान
प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांची नुकतीच कॉंग्रेस भवनमध्ये बैठक पार पडली. यावेळी काही प्रमुख नेत्यांनी दांडी मारल्याने कॉंग्रेसमध्ये असणारी धुसफूस उघड झाली. बैठकीत गैरहजर राहणारे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपण नाराज नसल्याचे सांगितले, परंतु पक्षाच्या निर्णयांमध्ये शहरातील नेतृत्वाकडून विश्वासात घेतले जात नसल्याच त्यांनी स्पष्टपणे सांगितल्याचे वृत्त “इंडियन एक्सप्रेस”ने दिले आहे. दुसरीकडे रमेश बागवे यांनी मात्र तिखट शब्दात पक्षीय नेतृत्वावर टीका केली.
हेही वाचा…“नवाब मलिकांच्या बेलमध्ये आणखी वाढ होतांना दिसेल,” सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
पटोले हे एकाधिकारशाही पद्धतीने काम करत असून, कॅन्टोन्मेंट मतदारसंघ निवडणुकीत माझ्या विरोधात काम करणाऱ्यांच्या घरी ते भेट देतात. ज्यांनी निवडणुकीत आमच्या उमेदवारांच्या विरोधात काम केले, अशा लोकांना त्यांनी पक्षात प्रवेश दिला. ब्लॉक अध्यक्षांच्या नेमणुका करताना भाजपशी संबंधित लोकांना घेण्यात आले. शहर पातळीवरील निर्णयांमध्ये वरिष्ठांचा कधीही सल्ला घेतला जात नाही किंवा त्यांना विश्वासात घेतले जात नाही, असं रमेश बागवे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“अरे वेड्या त्या गाडीत नव्हतोच, तर उतरणार कसा ?”, अजित पवारांनी ‘तो’ दावा फेटाळला
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा, शिंदेंनी ‘दोन’ उपमुख्यमंत्र्यांपासून सावध राहावं”
हेही वाचा…“पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांना दोन मोठ्या ऑफर,” काॅंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचा दावा
हेही वाचा…शरद पवारांच्या भेटीची तक्रार काॅंग्रेसच्या हायकमांडकडे, राहुल गांधी चर्चा शरद पवारांसोबत चर्चा करणार
हेही वाचा…“अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाईल, असं मुळीच वाटत नाही”