नाशिक : माझ्या पक्षातील सहकाऱ्यांनी कुणालाही जातीने पाहू नये. जातीवरून भेद करू नये. मला ते चालणार नाही. हा खालच्या जातीचा, तो वरच्या जातीचा हे कुणी ठरवलं? आपण शिवछत्रपतींचं नाव घेतो, ज्यांनी अठरापगड जातींना एकत्र आणून रयतेचं स्वराज्य उभं केलं. त्याचं भान ठेवा, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. नाशिक येथे मनसेचा १० वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…“शिंदे अन् अजित पवार गटाचा राजकीय अंत निश्चित, भाजप ४८ जागांवर निवडणुक लढवेल”
राज ठाकरे यांनी राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबतही भाष्य केले. ते म्हणाले की, राज्यात जी मराठा आरक्षणावरून आश्वासनं दिली जातात ती सर्व खोटी आहेत. त्यासाठी केंद्राने पुढाकार घ्यायला हवा. परंतु केंद्राने जर मराठा आरक्षण द्यायचं ठरवलं तर त्यांना प्रत्येक राज्यातील आरक्षणाची मागणी असलेल्या जातींना आरक्षण द्यावं लागेल. जे नेत्यांना राजकीय दृष्ट्या अडचणीचं ठरेल म्हणून हा प्रश्न रखडवत ठेवला जातो आणि जाती भेद निर्माण करून मतांचं राजकारण केलं जातं.
मराठा आरक्षणावरून फक्त राजकारण सुरु आहे. मी जरांगे-पाटील ह्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या समोर सांगितलं होतं… आरक्षण मिळणार नाही. ह्याचा अर्थ मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं नाही तर तांत्रिकदृष्ट्या ते तितकंच किचकट आहे. असेही राज ठाकरे म्हणाले. तर राजकारणात प्रचंड संयम लागतो. राजकीय कार्यकर्त्यांमध्ये संयम असलाच पाहिजे. आज मोदींच्या रूपात भाजपा जे यश अनुभवतोय त्यात मोदींचं श्रेय आहेच पण अनेक दशकांच्या कार्यकर्त्याचीही मेहनत, संयम आणि संघर्ष पण आहे. असा कानमंत्रीही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
हेही वाचा…आढळरावांची निवडणुकीतून माघार ? शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट
मी आत्मविश्वासाने सांगतो मी यश खेचून आणणार. आजकाल सध्या पक्षांतराचा ट्रेंड आहे. पण दुसऱ्यांची पोरं मला कडेवर घेऊन फिरायची नाहीत. मला राजकारणात माझे सहकारी मोठे करायचे आहेत. महाराष्ट्रात तीनच पक्ष प्रामुख्याने निर्माण झाले. तुम्ही म्हणाल ह्यादरम्यान राष्ट्रवादी हा पक्ष निर्माण झाला… पण निवडून येणाऱ्या लोकांची मोळी होती. त्यामुळे एक जनसंघ, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हेच पक्ष तळागाळातून निर्माण झाले. आणि त्यात विशेष ह्या पक्षातील कार्यकर्ते ९९% सर्वसामान्य घरातील होते. असा टोलाही त्यांनी लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…“खोट्या शपथा घेऊन आई तुळजाभवानीचा अपमान करू नका”, भाजपचा ठाकरेंवर पलटवार
हेही वाचा…“शिर्डी मतदारसंघात मी स्वत: निवडणुक लढणार”, महायुतीकडून आठवलेंनी मागितली जागा
हेही वाचा..भास्कर जाधव उद्या मोठा निर्णय घेणार ? उद्या कार्यकर्त्यांसोबत एकत्रित संवाद साधणार
हेही वाचा…कॉंग्रेसने लोकसभेसाठी जाहीर केले ३९ उमेदवार, राहुल गांधी यांच्यासह नव्या चेहऱ्यांना संधी
हेही वाचा…“चर्चा कोणतीही होवो, माझं तिकीट कन्फर्म,” संजय मंडलकींचा कोल्हापुरच्या जागेवर दावा