रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना नेते आणि उच्च तंत्रज्ञान, शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा चांगलाच राजकीय वाचक निर्माण झालेला आहे. यंदाच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीदरनाम्यान त्यांचा हा वरचष्मा सर्वांनाच दिसून आलेला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे(भारतीय जनता पक्ष) आणि उदय सामंत(शिवसेना) यांच्यातच सरळ सरळ लढत होती.
एसटी कर्मचाऱ्यांचा पुढचा मोर्चा शरद पवार यांच्या घरावर; वंचित आघाडीचा इशारा
रत्नागिरी जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी रत्नागिरी जिल्हा बँक अखेरीस शिवसेना पक्षाच्या ताब्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तानाजीराव चोरगे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलने निवडणूक लढविली होती. त्यांना निलेश राणे यांच्या पॅनलचं कडवं आव्हान होतं.
अखेर रामदास कदम यांना ‘रामराम’; शिवसेनेतून सुनील शिंदे, बाजोरीया यांना उमेदवारी
जिल्हा बँकेत २१ जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार होती. याआधीच १४ जागा या बिनविरोध झाल्या होत्या. ७ जागांसाठी निवडणूक होणार होती.७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ५ जागा सामंत यांच्या सहकार पॅनलने राखल्या तर विरोधी पॅनलचे अजित यशवंतराव दुग्ध मतदार संघातून आणि लांजा तालुका मतदारसंघातून भाजपा अध्यक्ष महेश उर्फ मुन्ना खामकर हे प्रथमच संचालक पदी निवडून आले आहेत.
‘चंद्रकांत पाटलांना शोक असेल तर शोकसभा घेऊ’, संजय राऊतांचा जोरदार टोला
जिल्हानिहाय मतदारसंघातील बँकेच्या चारपैकी तीन जागा सहकार पॅनेलने जिंकल्या. यात दिनेश मोहिते, संजय रेडीज, सुरेश कांबळे विजयी झाले. यापैकी एक जागा विरोधी गटाच्या अजित यशवंतराव यांनी जिंकली. रत्नागिरी, गुहागर आणि लांजा या तीन तालुका मतदारसंघापैकी लांजा येथे सहकार पॅनेलचा पराभव झाला. येथे विरोधी उमेदवार महेश खामकर विजयी झाले. रत्नागिरी जिल्हा बँकेसाठी १९ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. जिल्ह्यातील एकूण ८७१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. ७ जागांसाठी एकूण १४ उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरले होते.
Read Also :
- कृषी कायदे रद्द करून मोदींनी मनाचा मोठेपणा दाखवला; देवेंद्र फडणवीसांची स्तुतीसुमने
- ‘त्यांनी माझी मानसिकता तपासावी, मी त्यांचं डोकं तपासतो’, चंद्रकांत पाटलांचा राऊतांवर पलटवार
- अजित पवार आणि अण्णा हजारे येणार एकाच व्यासपीठावर; राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या
- रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला यश; केंद्र आणि राज्य सरकारने दिले भेटीचे निमंत्रण
- ‘प्यार मे इजहार और राजनिती मे प्रचार’; मलिकांचा अजित पवारांना राजकीय सल्ला