अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यातील संबंध कधी मधूर राहिलेले नाहीत. त्यामुळे अण्णा हजारे व पवार कुटूंबीय कधी सहसा एकत्र दिसत नाहीत. अशातच पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील एका धार्मिक कार्यक्रमासाठी अण्णा हजारे व उपमुख्यमंत्री अजित पवार एका व्यासपीठावर दिसणार आहेत. त्यामुळे राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.
“कृषी कायदे लवकर मागे घेतले असते, तर हजारो शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते”
उत्तर पेशवेकालीन संत निळोबाराय हे पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे रहायचे. पिंपळनेर हे गाव राळेगण सिद्धी जवळ आहे. संत निळोबाराय महाराजांचा अभंग गाथा प्रकाशन सोहळा व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जीर्णोध्दार शुभारंभ कार्यक्रम अण्णा हजारे व अजित पवार यांच्या हस्ते रविवारी ( ता. 21 ) सकाळी होणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार नीलेश लंके आदी उपस्थित राहणार आहेत.
वितुष्ट सुरू झालं ते अण्णा हजारेंच्या पहिल्या भ्रष्टाचार आंदोलनापासून. 1989ला अण्णा हजारे यांनी सामाजिक वनीकरण व पाणी पुरवठा योजनांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली. त्यावेळी नेमके शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यांच्याकडेच वनखाते होते. या भ्रष्टाचार प्रकरणांत कारवाई होत नसल्याचे पाहत अण्णा हजारे यांनी वृक्षमित्र पुरस्कार राज्य सरकारला परत केला. त्यावेळी शरद पवार व अण्णा हजारेंत शाब्दिक चकमकीही झाल्या. आंदोलने करूनही मार्ग निघत नसल्याने अण्णा हजारे यांनी 1994ला पद्मश्री पुरस्कारही परत केला. त्याच वर्षी त्यांनी भ्रष्टाचार विरोधातील पहिले उपोषण केले होते. महाराष्ट्र दिनी सुरू केलेले हे उपोषण सहा दिवस चालले. अण्णांच्या आंदोलनामुळे काँग्रेसचे सरकार गेले. युतीचे सरकार 1995ला सत्तेत आले.
‘पक्षाने विश्वास टाकला, सर्वांचे आभार, विधिमंडळात पुन्हा जोमाने काम करणार’
अण्णा हजारेंमुळेच सरकार गेले हे शरद पवारांनी मनावर घेतले. युती सरकारवरही अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. युती सरकारने अण्णा हजारेंना पुण्याच्या येरवाडा कारागृहात रवानगी केली होती. तरीही यावर शरद पवार यांनी भाष्य करणे टाळले.
Read Also :
- रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला यश; केंद्र आणि राज्य सरकारने दिले भेटीचे निमंत्रण
- ‘प्यार मे इजहार और राजनिती मे प्रचार’; मलिकांचा अजित पवारांना राजकीय सल्ला
- ‘चंद्रकांत पाटलांना शोक असेल तर शोकसभा घेऊ’, संजय राऊतांचा जोरदार टोला
- अखेर रामदास कदम यांना ‘रामराम’; शिवसेनेतून सुनील शिंदे, बाजोरीया यांना उमेदवारी
- फडणवीसांचा ‘तो’ गुण चांगला; नवाब मलिक यांनी कौतुक करत मारला टोला