नाशिक – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर चंद्रकात पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख आणि समृद्धी आणणारे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने आणि दुःखाने घेतला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे, अशी खंत व्यक्त केली. त्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाटलांना टोला लगावला. आता पाटलांनीही राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
माझा शोक संदेश चंद्रकांत पाटील यांना पाठवेल. त्यांच्यासाठी हा शोक असेल तर त्यासाठी आपण शोकसभा घेऊ. देश उत्सव साजरा करत असेल तेव्हा जर कुणाला शोक वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. त्यावर बोलताना ते निम्मे डॉक्टर आहेत. मी त्यांच्याकडेच आता जातो. अलीकडे ते आणि नवाब मलिक काहीही बोलतात. त्यांनी माझी मानसिकता तपासावी आणि मी त्यांचं डोकं तपासतो. त्यांची स्मृती कमी आहे. काँग्रेसनं एक कायदा तीन वेळा आणला आणि तो तिन्ही वेळेस रद्द करावा लागला, असं प्रत्युत्तर पाटील यांनी दिलं.
एसटी कर्मचाऱ्यांचा पुढचा मोर्चा शरद पवार यांच्या घरावर; वंचित आघाडीचा इशारा
मी कंगना रनौत यांचा प्रवक्ता नाही. संजय राऊत दिवसभरात 10 वेळेस बोलतील मला तेवढा वेळ नाही, असा टोलाही पाटलांनी राऊतांना लगावला. तर भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात मंत्री छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील, संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर असे अनेक नेते एकत्र आले होते. त्यावेळी चाललेल्या गप्पागोष्टींबद्दल विचारलं असता, आपल्याकडे संस्कृती आहे त्यानुसार मंगलप्रसंगी सगळे एकत्र येतात. अगदी 5 भाऊ असले आणि भांडले तरी ते एकत्र येतात, असं पाटील म्हणाले.
Read Also :
- अजित पवार आणि अण्णा हजारे येणार एकाच व्यासपीठावर; राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या
- रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला यश; केंद्र आणि राज्य सरकारने दिले भेटीचे निमंत्रण
- ‘प्यार मे इजहार और राजनिती मे प्रचार’; मलिकांचा अजित पवारांना राजकीय सल्ला
- ‘चंद्रकांत पाटलांना शोक असेल तर शोकसभा घेऊ’, संजय राऊतांचा जोरदार टोला
- अखेर रामदास कदम यांना ‘रामराम’; शिवसेनेतून सुनील शिंदे, बाजोरीया यांना उमेदवारी